शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर अन् धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 16:40 IST

पालखी मार्गाचे भूमिपूजन; मोदीकडून राम कृष्ण हरीचा जयघोष..

पंढरपूर/सोलापूर - पालखी मार्गाच्या कामामुळे पंढरपूरसोबतच परिसरातील इतर जिल्ह्याचा विकास वेगाने होईल. उद्योग, व्यवसायासोबतच धार्मिक पर्यटन वाढेल. पंढरपूरच्या विकासात लोकसहभाग वाढल्यास भविष्यात पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर धार्मिक तीर्थक्षेत्र नक्कीच बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पंढरपूरकरांकडून तीन गोष्टी व्यक्त केल्या. मोदी यांनी पंढरपूरकरांना सांगितले की, पालखी मार्गावरील पायी रस्त्याच्या  बाजूला थंड सावली देणारे वृक्ष लावावे, पालखी मार्गावर ठीक ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली जावी अन् भविष्यात पंढरपुरला भारतातील स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जावे यासाठी काम करावे अशी आशा व्यक्त केली. 

आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीच्या वाटेवर असतात. हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे. लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात, तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे विस्तारीकरण करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. आज या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही. के. सिंग, राज्यपाल भगतसिंह कोश्यािर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्र व राज्यातील अन्य मंत्री उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंढरपूरशी जोडण्याच्या उद्देशाने दोन रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (एनएच-९६५) पाच विभागांच्या चौपदरीकरणासाठी आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (एनएच-९६५ जी) तीन विभागांच्या चौपदरीकरणाचे त्यांनी भूमिपूजन केले. या राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूला 'पालखी' साठी समर्पित पदपथ तयार केले जातील, ज्यामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित रस्ता मिळेल. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित असलेल्या पंढरपूर या यात्रेकरूंचा प्रवास सुकर करण्यासाठी हे प्रकल्प तयार करण्यात आल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस