शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 14:10 IST

वैष्णवांना आगमनाची उत्कंठा : अकलूज-पंढरपूर वाहतूक मार्गात बदल

माळशिरस : आबालवृद्धांना भक्तीचं वेड लावणारा पालखी सोहळा सुरू असून यातील प्रमुख संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ४ जुलै रोजी आणि संत तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी झाली आहे. पुरवठा, स्वच्छतासह विविध गोष्टींवर शासनाने भर दिला आहे.

पालखी सोहळ्याचे प्रमुख केंद्र पंढरपूर असल्यामुळे जिल्हा प्रशासनावर मोठा ताण येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर द्यावा लागणार आहे. पालखी महामार्ग, स्वागत मार्गावर ग्रामपंचायतींकडून तयारी झाली आहे. प्रशासनाने नियोजन बैठकांवर भर दिला आहे.

या संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनाने सेवा सुविधा पुरवल्या आहेत. वारी ज्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे त्या पालखीतळावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पालखीतळावर पोलीस मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाईनचीही मदत मिळणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांची वेगळी रांग राहणार आहे.

वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला आहे. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै दरम्यान रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून पंढरपूरकडे फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूरमार्गे पंढरपूरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक पुणे, बारामती, इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर किंवा पुणे, यवत, इंदापूर, टेंभुर्णी आणि पंढरपूर अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पंढरपूर आणि सांगोलाकडून वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक पंढरपूर, टेंभुर्णी आणि पुणे अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ६ जैल रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याहून इंदापूर ते अकलूज मार्गावरील वाहतूक बंद राहील. त्या ऐवजी इंदापूर, टेंभुर्णी आणि अकलूज या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

तसेच १ जुलै रोजी रात्री ११ वाजेपासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सोलापूरहून पंढरपूर ते अकलूज हा मार्ग बंद वाहतुकीसाठी राहणार आहे. अकलूजहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अकलूज, टेंभुर्णी, सोलापूर या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच सोलापूर-अकलूज प्रवासासाठी सोलापूर, टेंभुर्णी, अकलूज या मार्गांचा वापर करावा लागणार आहे. महाळूंग, श्रीपूर, माळखांबी या दिशेने पालखीमार्गाकडील वाहनांना प्रवेश बंद आहे. या सर्व काळात संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. महिला वारकऱ्यांना वारी सुरक्षित व्हावी म्हणून राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर ग्रामीण निर्भया पथके निर्माण केली आहेत.

---

माऊलीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगरमध्ये

२१ जून रोजी माऊलीच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले आहे. या पालखीचा ४ जुलै रोजी धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम नातेपुते येथे असणार आहे. ५ जुलै रोजी मांडवेओढा येथे विसावा असणार आहे. पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथे होणार आहे. दुसरा मुक्काम माळशिरस येथे असणार आहे. ६ जुलै रोजी खुडूस येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. वेळापूर येथे मुक्काम असणार आहे. ७ जुलै रोजी भंडीशेगाव येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै रोजी वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पालखी पंढरपुरात पालखी दाखल होणार आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.

----

तुकाराम महाराज पालखीचे पहिले रिंगण अकलूजमध्ये

संत तुकाराम महाराज पालखीचा ५ जुलै रोजी अकलूज येथे जिल्ह्यात प्रवेश होत आहे. याच दिवसी रिंगण सोहळा व मुक्काम राहणार आहे. ६ जुलै माळीनगर येथे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम राहणार आहे. ७ जुलै राजी पिराची कुरोली येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पंढरपुरात दाखल आणि १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी