शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 14:10 IST

वैष्णवांना आगमनाची उत्कंठा : अकलूज-पंढरपूर वाहतूक मार्गात बदल

माळशिरस : आबालवृद्धांना भक्तीचं वेड लावणारा पालखी सोहळा सुरू असून यातील प्रमुख संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ४ जुलै रोजी आणि संत तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी झाली आहे. पुरवठा, स्वच्छतासह विविध गोष्टींवर शासनाने भर दिला आहे.

पालखी सोहळ्याचे प्रमुख केंद्र पंढरपूर असल्यामुळे जिल्हा प्रशासनावर मोठा ताण येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर द्यावा लागणार आहे. पालखी महामार्ग, स्वागत मार्गावर ग्रामपंचायतींकडून तयारी झाली आहे. प्रशासनाने नियोजन बैठकांवर भर दिला आहे.

या संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनाने सेवा सुविधा पुरवल्या आहेत. वारी ज्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे त्या पालखीतळावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पालखीतळावर पोलीस मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाईनचीही मदत मिळणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांची वेगळी रांग राहणार आहे.

वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला आहे. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै दरम्यान रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून पंढरपूरकडे फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूरमार्गे पंढरपूरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक पुणे, बारामती, इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर किंवा पुणे, यवत, इंदापूर, टेंभुर्णी आणि पंढरपूर अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पंढरपूर आणि सांगोलाकडून वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक पंढरपूर, टेंभुर्णी आणि पुणे अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ६ जैल रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याहून इंदापूर ते अकलूज मार्गावरील वाहतूक बंद राहील. त्या ऐवजी इंदापूर, टेंभुर्णी आणि अकलूज या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

तसेच १ जुलै रोजी रात्री ११ वाजेपासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सोलापूरहून पंढरपूर ते अकलूज हा मार्ग बंद वाहतुकीसाठी राहणार आहे. अकलूजहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अकलूज, टेंभुर्णी, सोलापूर या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच सोलापूर-अकलूज प्रवासासाठी सोलापूर, टेंभुर्णी, अकलूज या मार्गांचा वापर करावा लागणार आहे. महाळूंग, श्रीपूर, माळखांबी या दिशेने पालखीमार्गाकडील वाहनांना प्रवेश बंद आहे. या सर्व काळात संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. महिला वारकऱ्यांना वारी सुरक्षित व्हावी म्हणून राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर ग्रामीण निर्भया पथके निर्माण केली आहेत.

---

माऊलीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगरमध्ये

२१ जून रोजी माऊलीच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले आहे. या पालखीचा ४ जुलै रोजी धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम नातेपुते येथे असणार आहे. ५ जुलै रोजी मांडवेओढा येथे विसावा असणार आहे. पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथे होणार आहे. दुसरा मुक्काम माळशिरस येथे असणार आहे. ६ जुलै रोजी खुडूस येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. वेळापूर येथे मुक्काम असणार आहे. ७ जुलै रोजी भंडीशेगाव येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै रोजी वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पालखी पंढरपुरात पालखी दाखल होणार आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.

----

तुकाराम महाराज पालखीचे पहिले रिंगण अकलूजमध्ये

संत तुकाराम महाराज पालखीचा ५ जुलै रोजी अकलूज येथे जिल्ह्यात प्रवेश होत आहे. याच दिवसी रिंगण सोहळा व मुक्काम राहणार आहे. ६ जुलै माळीनगर येथे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम राहणार आहे. ७ जुलै राजी पिराची कुरोली येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पंढरपुरात दाखल आणि १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी