शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 14:10 IST

वैष्णवांना आगमनाची उत्कंठा : अकलूज-पंढरपूर वाहतूक मार्गात बदल

माळशिरस : आबालवृद्धांना भक्तीचं वेड लावणारा पालखी सोहळा सुरू असून यातील प्रमुख संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ४ जुलै रोजी आणि संत तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. या पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारी झाली आहे. पुरवठा, स्वच्छतासह विविध गोष्टींवर शासनाने भर दिला आहे.

पालखी सोहळ्याचे प्रमुख केंद्र पंढरपूर असल्यामुळे जिल्हा प्रशासनावर मोठा ताण येणार आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर द्यावा लागणार आहे. पालखी महामार्ग, स्वागत मार्गावर ग्रामपंचायतींकडून तयारी झाली आहे. प्रशासनाने नियोजन बैठकांवर भर दिला आहे.

या संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनाने सेवा सुविधा पुरवल्या आहेत. वारी ज्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे त्या पालखीतळावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक पालखीतळावर पोलीस मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाईनचीही मदत मिळणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांची वेगळी रांग राहणार आहे.

वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला आहे. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै दरम्यान रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून पंढरपूरकडे फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूरमार्गे पंढरपूरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. ही वाहतूक पुणे, बारामती, इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर किंवा पुणे, यवत, इंदापूर, टेंभुर्णी आणि पंढरपूर अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पंढरपूर आणि सांगोलाकडून वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक पंढरपूर, टेंभुर्णी आणि पुणे अशी राहील. १ जुलै रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ६ जैल रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याहून इंदापूर ते अकलूज मार्गावरील वाहतूक बंद राहील. त्या ऐवजी इंदापूर, टेंभुर्णी आणि अकलूज या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

तसेच १ जुलै रोजी रात्री ११ वाजेपासून ते १० जुलै रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सोलापूरहून पंढरपूर ते अकलूज हा मार्ग बंद वाहतुकीसाठी राहणार आहे. अकलूजहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अकलूज, टेंभुर्णी, सोलापूर या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. तसेच सोलापूर-अकलूज प्रवासासाठी सोलापूर, टेंभुर्णी, अकलूज या मार्गांचा वापर करावा लागणार आहे. महाळूंग, श्रीपूर, माळखांबी या दिशेने पालखीमार्गाकडील वाहनांना प्रवेश बंद आहे. या सर्व काळात संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. महिला वारकऱ्यांना वारी सुरक्षित व्हावी म्हणून राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर ग्रामीण निर्भया पथके निर्माण केली आहेत.

---

माऊलीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगरमध्ये

२१ जून रोजी माऊलीच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान झाले आहे. या पालखीचा ४ जुलै रोजी धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होणार आहे. या पालखीचा पहिला मुक्काम नातेपुते येथे असणार आहे. ५ जुलै रोजी मांडवेओढा येथे विसावा असणार आहे. पहिले गोल रिंगण सदाशिवनगर येथे होणार आहे. दुसरा मुक्काम माळशिरस येथे असणार आहे. ६ जुलै रोजी खुडूस येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे. वेळापूर येथे मुक्काम असणार आहे. ७ जुलै रोजी भंडीशेगाव येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै रोजी वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पालखी पंढरपुरात पालखी दाखल होणार आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.

----

तुकाराम महाराज पालखीचे पहिले रिंगण अकलूजमध्ये

संत तुकाराम महाराज पालखीचा ५ जुलै रोजी अकलूज येथे जिल्ह्यात प्रवेश होत आहे. याच दिवसी रिंगण सोहळा व मुक्काम राहणार आहे. ६ जुलै माळीनगर येथे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम राहणार आहे. ७ जुलै राजी पिराची कुरोली येथे मुक्काम राहणार आहे. ८ जुलै वाखरीत मुक्काम राहणार आहे. ९ जुलै रोजी पंढरपुरात दाखल आणि १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी