शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पालेभाज्यांचे भाव तिपटीने कडाडले; कांदा, बटाटे अन् टोमॅटो मात्र स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:21 IST

ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे.

ठळक मुद्देभाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिलाया दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. टोमॅटो, कांदा, बटाटे वगळता बाजारपेठेत बहुतांश पालेभाज्यांचे दर या आठवडाभरात चक्क तिपटीने वाढले आहेत. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे. किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान मानत असल्याच्या प्रतिक्रिया लक्ष्मी मंडईतील व्यावसायिकांतून उमटल्या.

मंद्रुप, नान्नज, तिºहे, कामती, बोरामणी, उळे, कासेगाव अशा उत्तर आणि दक्षिण सोलापूरसह मोहोळ तालुक्यातूनही शहराला भाज्यांचा पुरवठा होतोय़ दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र पाण्याचा तुटवडा असल्याने पालेभाज्या उगवण्याऐवजी पेरलेले बियाणे जळून गेले आहे आणि उगवण कमी झाली़ परिणामत: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच भाजी मंडयांमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आणि दर तिपटीवर पोहोचला़ भेंडी आणि दोडक्याचे दर या आठवडाभरात हळूहळू वाढत गेले.

या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.

गवारी उगवण्याआधीच जळाली - उन्हाळ्यात गवार उगवत असताना याला पाणी मोठ्या प्रमाणात लागते़ मात्र सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे़ अनेक शेतकºयांचे बोअरवेल बंद आहेत, बहुतांश शेतकºयांच्या बोअरवेलची पाणीपातळी पाचशे फु टाच्या खाली गेली आहे़ काही ठिकाणी गवार उगवलीच नाही़ जळून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ उन्हाळ्यात हे पीक शेतकºयाला बºयापैकी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते़.

वांग्याला उचल नाही- भाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिला. परिणामत: साधी आणि काटेरी वांग्याची आवक पुरेशा प्रमाणात असूनही याला उठाव नाही़ अशीच स्थिती कांदा (१२ रुपये किलो), बटाटे (२० रुपये किलो), लसूण (४० रुपये किलो) यांच्याबाबत असल्याचे भाजीपाला व्यावसायिक सांगतात.

 मागील चार माहिन्यांत यांचे दर वाढलेले नाहीत. मे महिना अधिकच कडक आणि कोरडाठाक मानला जातो़ या काळात दरवर्षी भाज्यांचे दर भडकतात़ मात्र मागील पाच वर्षात प्रथमच दर तिपटीने कडाडले आहेत़ मे महिन्यात या सध्या बाजारपेठेत असलेल्या भाज्यांचे दर आणखी भडकतील, आवकही घटेल अशी स्थिती आहे़- सागर चव्हाण, भाजी विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार