शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

सोलापुरात पालेभाज्यांचे भाव तिपटीने कडाडले; कांदा, बटाटे अन् टोमॅटो मात्र स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:21 IST

ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे.

ठळक मुद्देभाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिलाया दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. टोमॅटो, कांदा, बटाटे वगळता बाजारपेठेत बहुतांश पालेभाज्यांचे दर या आठवडाभरात चक्क तिपटीने वाढले आहेत. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे. किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान मानत असल्याच्या प्रतिक्रिया लक्ष्मी मंडईतील व्यावसायिकांतून उमटल्या.

मंद्रुप, नान्नज, तिºहे, कामती, बोरामणी, उळे, कासेगाव अशा उत्तर आणि दक्षिण सोलापूरसह मोहोळ तालुक्यातूनही शहराला भाज्यांचा पुरवठा होतोय़ दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र पाण्याचा तुटवडा असल्याने पालेभाज्या उगवण्याऐवजी पेरलेले बियाणे जळून गेले आहे आणि उगवण कमी झाली़ परिणामत: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच भाजी मंडयांमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आणि दर तिपटीवर पोहोचला़ भेंडी आणि दोडक्याचे दर या आठवडाभरात हळूहळू वाढत गेले.

या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.

गवारी उगवण्याआधीच जळाली - उन्हाळ्यात गवार उगवत असताना याला पाणी मोठ्या प्रमाणात लागते़ मात्र सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे़ अनेक शेतकºयांचे बोअरवेल बंद आहेत, बहुतांश शेतकºयांच्या बोअरवेलची पाणीपातळी पाचशे फु टाच्या खाली गेली आहे़ काही ठिकाणी गवार उगवलीच नाही़ जळून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ उन्हाळ्यात हे पीक शेतकºयाला बºयापैकी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते़.

वांग्याला उचल नाही- भाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिला. परिणामत: साधी आणि काटेरी वांग्याची आवक पुरेशा प्रमाणात असूनही याला उठाव नाही़ अशीच स्थिती कांदा (१२ रुपये किलो), बटाटे (२० रुपये किलो), लसूण (४० रुपये किलो) यांच्याबाबत असल्याचे भाजीपाला व्यावसायिक सांगतात.

 मागील चार माहिन्यांत यांचे दर वाढलेले नाहीत. मे महिना अधिकच कडक आणि कोरडाठाक मानला जातो़ या काळात दरवर्षी भाज्यांचे दर भडकतात़ मात्र मागील पाच वर्षात प्रथमच दर तिपटीने कडाडले आहेत़ मे महिन्यात या सध्या बाजारपेठेत असलेल्या भाज्यांचे दर आणखी भडकतील, आवकही घटेल अशी स्थिती आहे़- सागर चव्हाण, भाजी विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार