शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सोलापुरात पालेभाज्यांचे भाव तिपटीने कडाडले; कांदा, बटाटे अन् टोमॅटो मात्र स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:21 IST

ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे.

ठळक मुद्देभाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिलाया दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा परिणाम थेट भाजीपाल्यांवर झाला आहे. टोमॅटो, कांदा, बटाटे वगळता बाजारपेठेत बहुतांश पालेभाज्यांचे दर या आठवडाभरात चक्क तिपटीने वाढले आहेत. याबरोबरच भाज्यांची आवक देखील घटली आहे. किलोभर किंवा दोन पेंड्यांऐवजी एकाच पेंडीच्या खरेदीवर ग्राहक समाधान मानत असल्याच्या प्रतिक्रिया लक्ष्मी मंडईतील व्यावसायिकांतून उमटल्या.

मंद्रुप, नान्नज, तिºहे, कामती, बोरामणी, उळे, कासेगाव अशा उत्तर आणि दक्षिण सोलापूरसह मोहोळ तालुक्यातूनही शहराला भाज्यांचा पुरवठा होतोय़ दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वत्र पाण्याचा तुटवडा असल्याने पालेभाज्या उगवण्याऐवजी पेरलेले बियाणे जळून गेले आहे आणि उगवण कमी झाली़ परिणामत: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच भाजी मंडयांमध्ये पालेभाज्यांची आवक घटली आणि दर तिपटीवर पोहोचला़ भेंडी आणि दोडक्याचे दर या आठवडाभरात हळूहळू वाढत गेले.

या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना तर पोहोचतोच. शिवाय हॉटेल, कँटीन, केटरिंग व्यावसायिक, मेसवाले, मंगल कार्यालयवाले यांना झळा पोहोचताहेत.

गवारी उगवण्याआधीच जळाली - उन्हाळ्यात गवार उगवत असताना याला पाणी मोठ्या प्रमाणात लागते़ मात्र सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे़ अनेक शेतकºयांचे बोअरवेल बंद आहेत, बहुतांश शेतकºयांच्या बोअरवेलची पाणीपातळी पाचशे फु टाच्या खाली गेली आहे़ काही ठिकाणी गवार उगवलीच नाही़ जळून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे़ उन्हाळ्यात हे पीक शेतकºयाला बºयापैकी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते़.

वांग्याला उचल नाही- भाजीमंडईत काही भाज्यांना मागणीच नाही. काही भाज्यांचा दर मागील चार महिन्यांपासून स्थिर राहिला. परिणामत: साधी आणि काटेरी वांग्याची आवक पुरेशा प्रमाणात असूनही याला उठाव नाही़ अशीच स्थिती कांदा (१२ रुपये किलो), बटाटे (२० रुपये किलो), लसूण (४० रुपये किलो) यांच्याबाबत असल्याचे भाजीपाला व्यावसायिक सांगतात.

 मागील चार माहिन्यांत यांचे दर वाढलेले नाहीत. मे महिना अधिकच कडक आणि कोरडाठाक मानला जातो़ या काळात दरवर्षी भाज्यांचे दर भडकतात़ मात्र मागील पाच वर्षात प्रथमच दर तिपटीने कडाडले आहेत़ मे महिन्यात या सध्या बाजारपेठेत असलेल्या भाज्यांचे दर आणखी भडकतील, आवकही घटेल अशी स्थिती आहे़- सागर चव्हाण, भाजी विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार