शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विशाखापट्टणम येथे नेऊन केला सोलापुरातील पेंटरचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:07 IST

सोलापूर शहर पोलीसांनी केली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल

ठळक मुद्देया प्रकरणी सोलापुरात फिर्याद देऊनही खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हताशेवटी महिबूब याच्या भावाने सोलापूरच्या न्यायालयात धाव घेतलीदिलेल्या फियार्दीवरून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले

सोलापूर : दोन तासांचे काम आहे असे सांगून घरातून घेऊन गेलेल्या इसमाला विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे नेऊन खून केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खासगी फिर्याद दिल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. 

कचरुद्दीन बांगेरी (वय ५२, रा. मदर इंडिया झोपडपट्टी चमडा कारखाना शेजारी, कुमठा नाका, सोलापूर), तुषार गोपीचंद कोळी (वय ३०, रा. मुळेगाव तांडा, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महिबूब सय्यद शेख (वय ३०, रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) हा पेंटर कारागीर होता. तो १० मे २०१९ रोजी आपल्या घरात काम करीत होता, तेव्हा दोन्ही आरोपी आले. दोघांनी महिबूब शेख याला अवघ्या दोन तासांचे काम आहे, तामलवाडी येथे जाऊन येऊ असे म्हणाले. महिबूब याची इच्छा नसतानाही दोघांनी बळजबरीने घेऊन गेले. रात्री १0 वाजले तरी महिबूब शेख घरी आला नाही म्हणून आई नसिमा शेख (वय ५८) यांनी कचरोद्दीन बांगेरी याच्या मोबाईलवर फोन करून चौकशी केली. कचरोद्दीन याने आम्ही तिघे आहोत, काळजी करू नका असे सांगितले.

तीन दिवस झाले तरी महिबूब घरी आला नाही, नंतर तुषार कोळी याच्या मोबाईलवरून महिबूब याने घरी फोन केला. ट्रक ड्रायव्हरने मला खूप लांब आणले आहे, मी कोठे आहे मलाच माहीत नाही. हे लोक मला खूप मारहाण करीत आहेत. मला बळजबरीने घेऊन जात आहेत असे म्हणत असताना त्याचा मोबाईल बंद झाला. घरच्यांनी त्याच मोबाईलवर अनेकवेळा फोन केला; मात्र तो बंद लागत होता. १५ मे २0१९ रोजी रात्री २.३0 वाजता शौकत बक्षी याला कचरुद्दीन शेख याने महिबूबचा विशाखापट्टणम येथे मृत्यू झाल्याची माहिती सांगितली. 

घरच्या लोकांनी नक्कापल्ली जि. विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे धाव घेऊन पाहणी केली असता तेथे महिबूब हा गंभीर जखमी होऊन मरण पावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. आरोपींनी जबरदस्ती करीत महिबूब याचा मृतदेह सोलापुरात आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या प्रकरणी सोलापुरात फिर्याद देऊनही खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता. शेवटी महिबूब याच्या भावाने सोलापूरच्या न्यायालयात धाव घेतली, दिलेल्या फियार्दीवरून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत. 

नक्कापल्ली येथील गार्डने सांगितले सत्य- नक्कापल्ली येथील एका कंपनीच्या आवारात महिबूब शेख याचा मृतदेह पडला होता. महिबूबच्या घरच्यांनी तेथे जाऊन पाहणी केली, संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र म्हणावी तशी दखल तेथे घेण्यात आली नाही. कंपनीतील एका सिक्युरिटी गार्डने महिबूब शेख याला बेदम मारहाण करून खून केल्याचे सांगितले. यामध्ये कचरुद्दीन बांगेरी व तुषार कोळी हे दोघेही होते अशी माहिती नातेवाईकांना दिली होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCourtन्यायालयAndhra Pradeshआंध्र प्रदेश