शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

दुसºयांचंही ‘घर’ असतं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:29 IST

काही म्हणा, माणसं शिकली हे खरं. प्रत्येकानं शिकायला तर हवंच, पण शिकलं म्हणजे खरंच शहाणपण येतं का हो? पदव्यांच्या ...

काही म्हणा, माणसं शिकली हे खरं. प्रत्येकानं शिकायला तर हवंच, पण शिकलं म्हणजे खरंच शहाणपण येतं का हो? पदव्यांच्या भेंडोळ्यांसोबत शहाणपणाही हवा आहे का नाही? असायलाच हवा ना! अर्थात अनेक जण शिकलेले आणि शहाणेसुरतेही आहेत म्हणा, पण काही साध्या गोष्टीत माणूस एवढा अडाणी कसा राहतो हा प्रश्न तसा कायम अनुत्तरितच राहतो बघा. छोट्या वाटणाºया पण मोठ्या असणाºया फार गोष्टी असतात हो या दुनियादारीत.

मोठ्या मोठ्या हॉटेलात पाळायचा शिष्टाचार कळतो, पण आपल्या किंवा दुसºयांच्या घरात कसे वागावं, हे मात्र कळत नाही राव यांना! हेच बघा ना, काही दिवसांपूर्वी भल्या सकाळीच एक जण माझयाकडे आला. आता एवढ्या सकाळी कुणी आलं म्हणजे काय उगीचंच येणार नाही ना? काहीतरी महत्त्वाचे काम असल्याशिवाय कोण कशाला येईल एवढ्या सकाळी. एकतर मीही भलत्याच घाईत होतो. तो आला, बसला, चहापान झाले; पण मुद्यावर काही येईनाच. दर दहा मिनिटांनी मी त्याला विचारतोय, काय विशेष? त्यावर त्याचे एकच उत्तर, ‘काही नाही.. निवांत. ‘बोलण्यासारखे सगळे विषय संपले, पण हा का आलाय ते काही सांगेना. घरी आलेल्या माणसाला का आलास?’ असंही विचारता येत नाही ना हो। तासाभराने मला थेट विचारावेच लागलं. ‘एवढ्या सकाळी काय काम काढलं?’ आळोखे पिळोखे देत तो म्हणाला, ‘काही नाही हो, निवांत आहे आज नि आपलं टाइमपास म्हणून आलोय!’ आत्ता बोला। 

बरे आपल्या सवयी अन् वेळेप्रमाणेच जगानेही वागावे, असा दुराग्रह कशासाठी हो! प्रत्येकाला आपलं जीवन कसं जगायचं, आपला वेळ कसा घालवायचा याचे स्वातंत्र्य आहे ना. कुणी कधी जेवायला बसावं, कुणी कधी झोप घ्यावी हे दुसºयांनी ठरवायचं का सांगा बरे! परवा असाच माझा एक मित्र घरी आला. बायकोनं सांगितलं, आत्ताच झोपलेत, पहाटेपर्यंत काम करीत बसले होते. उठवलं तर चिडतील, बायकोनं नाही उठवलं म्हणून या पठ्ठ्यानं स्वत:च उठवलं आणि वर म्हणतो कसा, काय झोपमोड झाली नाही ना? आता याच्या पेकाटात लाथ नाही का घालावी? झोपेतून उठवतोय अन् पुन्हा झोपमोड झाली काय म्हणून विचारतोय!

राग आला असला तरी काय? शिवाय काहीतरी महत्त्वाचेच काम असल्याशिवाय असे कोण वागेल! मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, ‘काही नाही हो, जरा पडावं म्हटलं तर झोपच येईना... म्हटलं चला, तुमच्याशी गप्पा मारत बसावं, हंऽ  हॅऽ!’ तुम्हीच सांगा, याला पायताणानं नाही का हो मारावं?  एक शेजारी तर असा काही भेटला मला, बाप रे! सकाळची घाईगडबड.. आॅफिसला जाण्याची माझी घाई अन् हा शेजारी भल्या सकाळी टपकणारच. ‘पेपर आला का नाही हो अजून?’ असं विचारत दारात पडलेलं वर्तमानपत्र उचलून थेट घरात येणार अन् निवांत वाचत बसणार, रोजचंच हे. फुकटात पेपर वाचायचा अन् वर आमच्याबरोबर चहा नाष्टाही भागायचा त्याचा. सगळं झालं तरी उठायचं नाव नाही घ्यायचा हा. शेवटी एकेदिवशी त्याची जागा दाखवायची पाळी आलीच. दुसºयाच्या घरी कधी जावं, किती वेळ थांबावं, याचा काहीच ताळमेळ कसा नसतो हो यांना? मग काय, यांना ही थुंकण्याचीच जागा वाटते. यांना काही बोलावं तर ते आधीचीच ‘चित्रकला’ दाखवितात. प्रत्येक नमुना वेगळाच हो! काही वाटत नाही यांना. असाच एक नमुना! भर उन्हात आला म्हणून त्याला थंड पाणी दिलं.

एक घोट पिताच तांब्या बाजूला ठेवून म्हणाला, ‘फिल्टरचं पाणी नाही वाटतं.., साधा फिल्टर नाही तुमच्याकडे? कितीही राग आला तरी गिळावा लागतो हो! माझ्या एका मित्राकडे नेहमी येणाºयांचा तर प्रताप काही औरच. घरातला समजून त्याच्यासमोर सगळे बोलायचे. चहापान करायचे. एकदा यालाच चहा करायला घरात साखर नव्हती. बहाद्दरानं गावभर केलं. मित्र विचारायला लागले, ‘एकाएकी एवढी वाईट परिस्थिती कशी आली हो?’ रोज वेगळे नमुने अनुभवायला  मिळतात या दुनियादारीत. तुमच्या घरात तुम्ही कसेही वागा हो, पण इतरांचेही घरपण जपा, दुसºयांचंही ‘घर’ असतं..!   - अशोक गोडगे-कदम(लेखक हे साहित्यिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरHomeघर