शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

सोलापुरात असलेल्या मिलिंद नगरातील अस्थिविहाराची त्रेसष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 09:52 IST

महापरिनिर्वाण दिन : मुंबई, नागपूरनंतर नतमस्तक होण्याचे ठिकाण

ठळक मुद्दे६ डिसेंबर १९५६ साली मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झालेभारतीय संविधान तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिविहाराला ६३ वर्षे पूर्ण होत आहेत मुंबई, नागपूरनंतर नतमस्तक होण्याचे तिसरे ठिकाण म्हणून सोलापुरातील अस्थिविहाराकडे पाहिले जाते

संताजी शिंदे 

सोलापूर : देशातील जाती-पातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे. अस्पृश्यतामुक्त समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे, सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून भारतीय संविधान तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिविहाराला ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई, नागपूरनंतर नतमस्तक होण्याचे तिसरे ठिकाण म्हणून सोलापुरातील अस्थिविहाराकडे पाहिले जाते. 

६ डिसेंबर १९५६ साली मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. पांजरापोळ चौकातील सी. नरसी ट्रान्स्पोर्टमध्ये निरोप आला. ही बातमी वाºयासारखी संपूर्ण शहर व जिल्ह्यात पसरली. तुकाराम (बुवा) इंगळे, केरू जाधव, अण्णासाहेब कदम, रामचंद्र जाधव, भीमराव सरवदे, एन. एस. कांबळे, लक्ष्मण आबुटे, मेसा सिद्धगणेश, दºयाप्पा जाधव, रामचंद्र रणशृंगारे, शिंदे गुरुजी आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. दि. ७ डिसेंबर रोजी लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अखेरचा निरोप देण्यात आला. तुकाराम (बुवा) इंगळे हे चार दिवस मुंबईतच राहिले आणि दि. ११ डिसेंबर १९५६ साली या अस्थी सकाळी ८ वाजता मद्रास मेलने मुंबईहून सोलापुरात आणण्यात आल्या.

मिरवणुकीनंतर बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे कार्यकर्त्यांनी मिटिंग घेऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’ या नावाने संस्था स्थापन करण्यात आली. येथील महार वतनदार पंच ट्रस्टच्या जागेत विठ्ठल मंदिराच्या शेजारी असलेल्या बौद्धविहारात हा अस्थिकलश ठेवण्यात आला. मुंबई, नागपूरनंतर बाबासाहेबांच्या अस्थी असलेले सोलापूर हे महाराष्ट्रातील तिसरे ठिकाण आहे. मिलिंद नगरात भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर शहर-जिल्ह्यात ज्या काही आंबेडकरी चळवळी झाल्या, त्यांची राजधानी म्हणून बुधवार पेठ, मिलिंद नगरला ओळखले जाते. हयातीमध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी घेतलेली महार वतनदार परिषद महाराष्ट्रात गाजली होती. परिषदेत भविष्यातील चळवळीवर विविध ठराव करण्यात आले होते. धर्मांतराची दीक्षा घेण्याचा इशारा इथे झालेल्या परिषदेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. 

राष्ट्रीय स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : चंदनशिवेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरला राजवाडा येथील अस्थिविहार प्रेरणाभूमीचा विकास करण्यात आला आहे. भीमसृष्टी आणि सोलापूरच्या भेटीतील आठवणींचा इतिहास शिल्प व छायाचित्रांच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. जवळ असलेल्या महापालिकेच्या बंद शाळेच्या जागेत राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी ११ कोटींचा निधी लागणार आहे. हा निधी मिळून कामाला सुरुवात होण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत. राष्ट्रीय स्मारकाबरोबर पर्यटनस्थळ म्हणून हा भाग विकसित करण्यावर माझा भर आहे, अशी माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर