शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पाच शेतकºयांच्या बळकाविलेल्या जमिनी परत करण्याचे सोलापूर जिल्हा उपनिबंधकांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:40 IST

सोलापूर : सावकारीच्या माध्यमातून बळकावलेली शेतजमीन पाच शेतकºयांना परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याशिवाय दावा दाखल झाल्यानंतर ...

ठळक मुद्देसंजय सरडे यांनी सावकारीतून जमीन बळकावल्याचा दावा साबळे यांनी केला होता.सावकारीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जमीन बळकावण्याचे अनेक प्रकार होतात.सावकारीच्या माध्यमातून बळकावलेली शेतजमीन पाच शेतकºयांना परत करण्याचे आदेश

सोलापूर: सावकारीच्या माध्यमातून बळकावलेली शेतजमीन पाच शेतकºयांना परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याशिवाय दावा दाखल झाल्यानंतर शेतकरी व सावकारांत चार प्रकरणात तडजोड झाली आहे.

सावकारीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जमीन बळकावण्याचे अनेक प्रकार होतात. यापैकी काहीच शेतकरी सावकारीच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधकांकडे करतात. मागील काही महिन्यांत यापैकी पाच शेतकºयांना जमीन परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी दिले आहेत. करमाळा तालुक्यातील करंजे येथील शेतकरी सुभाष कृष्णा साबळे यांना सावकाराकडून ७१ आर जमीन परत देण्याचे आदेश झाले आहेत.

संजय सरडे यांनी सावकारीतून जमीन बळकावल्याचा दावा साबळे यांनी केला होता. अनकढाळ(सांगोला) येथील पितांबर विठोबा बंडगर यांना ८१आर जमीन परत मिळाली आहे. बाबासाहेब बंडगर यांच्या विरोधात पितांबर यांनी दावा केला होता. चिंचोली (माढा) येथील भारत वामन लोेंढे यांची ९० आर जमीन अशाच पद्धतीने शिवाजी जाधव यांच्याकडून परत देण्याचे आदेश झाले आहेत. करमाळ्यातील शेलगाव(क) येथील चांगदेव नामदेव माने यांना दोन हेक्टर जमीन परत द्यावी, असे आदेश वैभव कोठारी यांना दिले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवनाथ विश्वनाथ कापसे यांनी दाव्यात शामसुंदर भुतडा,अशोक लोंढे व इतरांनी सावकारीतून दोन हेक्टर ८५आर जमीन बळकावल्याचे म्हटले होते. जिल्हा उपनिबंधकांनी ही जमीन कापसे यांना द्यावी, असे आदेश काढले आहेत. शिवाजी मारुती रेड्डी यांची ६१ आर जमीन शीतलकुमार जाधव यांनी सावकारीतून बळकावल्याची, एक हेक्टर जमीन बळकावल्याचा रामा गोविंदा शिंदे यांनी त्रिंबक काळे यांच्या विरोधात तर ८० आर जमीन बळकावल्याचा अरुण बब्रुवान गुंडे यांनी प्रतीक ढंगे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. दाव्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर तडजोडीने दावे मागे घेण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्हा बँक प्रशासकाचा पदभार होता त्यावेळी सावकारी दाव्याकडे फारसे लक्ष देता आले नाही. सध्या दिलेल्या तारखेप्रमाणे सुनावण्या घेऊन निर्णय दिले जात आहेत. खेड्यापाड्यातून येणाºया शेतकºयांच्या दाव्यांचे निर्णय वेळेवर दिले तर त्यांचा त्रास वाचतो. - अविनाश देशमुख,जिल्हा उपनिबंधक, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेती