शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ साडेचव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांनाच मिळाला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:17 IST

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ...

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना कळवली होती. त्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांनी दिलेली माहिती ग्राह्य धरली. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामासाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी १ लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्राची प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती.

पीक विम्यापोटी शेतकरी हिस्सा १० कोटी ३४ लाख रुपये व सरकारचा हिस्सा ११० कोटी असा १२० कोटी ३४ लाख रुपये एवढा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला होता. यातील केवळ ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळाली आहे. उर्वरित तब्बल २ लाख २५ हजार ८६२ शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. विमा कंपन्यांनी ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा लाभ जिल्ह्याला दिला असला तरी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

पीक विमा भरलेली तालुकानिहाय आकडेवारी

उत्तर सोलापूर १४५२, दक्षिण सोलापूर ८९७, बार्शी ३० हजार ८१६, अक्कलकोट १७१३, मोहोळ ६३७, माढा १८२, करमाळा २५७, पंढरपूर १२, सांगोला ३९, माळशिरस ९७, मंगळवेढा १९४१ अशा सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार ४३ शेतकऱ्यांना ३५ कोटी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर काढणी पश्चात नुकसान झालेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ४६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.