शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

केवळ साडेचव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांनाच मिळाला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:17 IST

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ...

सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे पिकांना फटका बसून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना कळवली होती. त्यातील ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांनी दिलेली माहिती ग्राह्य धरली. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामासाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा २ लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी १ लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्राची प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली होती.

पीक विम्यापोटी शेतकरी हिस्सा १० कोटी ३४ लाख रुपये व सरकारचा हिस्सा ११० कोटी असा १२० कोटी ३४ लाख रुपये एवढा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरला होता. यातील केवळ ४४ हजार ५३२ शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळाली आहे. उर्वरित तब्बल २ लाख २५ हजार ८६२ शेतकऱ्यांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. विमा कंपन्यांनी ३९ कोटी ५२ लाख रुपयांचा लाभ जिल्ह्याला दिला असला तरी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

पीक विमा भरलेली तालुकानिहाय आकडेवारी

उत्तर सोलापूर १४५२, दक्षिण सोलापूर ८९७, बार्शी ३० हजार ८१६, अक्कलकोट १७१३, मोहोळ ६३७, माढा १८२, करमाळा २५७, पंढरपूर १२, सांगोला ३९, माळशिरस ९७, मंगळवेढा १९४१ अशा सोलापूर जिल्ह्यातील ३८ हजार ४३ शेतकऱ्यांना ३५ कोटी ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर काढणी पश्चात नुकसान झालेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ४६ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.