शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

काश्मिरातली देखणी माणसं सोलापुरात उचलतात ओझं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:03 IST

बिहारीबाबू, बंगालीदादा निभावताहेत माथाडीची भूमिका; ट्रान्स्पोर्ट अन् डाळ कारखान्यात रोजगार 

ठळक मुद्देबिहारीबाबू कामगार कम हमालीचे काम करताना पक्के सोलापूरकर होऊन गेलेतमुकादमाच्या माध्यमातून एक टोळी गेली की दुसरी टोळी त्यांची जागा घेतेसोलापुरात काय आहे? यापेक्षा इथे काय नाही, या प्रश्नाचे उत्तर हेच परप्रांतातील कामगार देऊ शकतात

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : भारतातील काश्मीर म्हणजं जणू भूतलावरील स्वर्गच... साडेसहा किंवा त्यापेक्षाही अधिक फूट उंच असलेली तिथली देखणी माणसं ट्रान्स्पोर्टमध्ये ओझं उचलताना अगदी निष्ठेने माथाडी कामगाराची भूमिका निभावत असतात. इथल्या बहुतांश डाळ कारखान्यातही बंगालीदादा, बिहारीबाबू कामगार कम हमालीचे काम करताना पक्के सोलापूरकर होऊन गेलेत. मुकादमाच्या माध्यमातून एक टोळी गेली की दुसरी टोळी त्यांची जागा घेते. 

सोलापुरात काय आहे? यापेक्षा इथे काय नाही, या प्रश्नाचे उत्तर हेच परप्रांतातील कामगार देऊ शकतात. एकीकडे सोलापुरात रोजगार नाही म्हणून इथली मंडळी इतरत्र स्थलांतर करीत असताना मात्र दुसरीकडे रोजगारासाठी जम्मू-काश्मीर, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल येथील अनेक बेरोजगार युवक रोजगारासाठी सोलापुरात दाखल होत असतात. सोलापूरची चादर आणि टॉवेल्स सातासमुद्रापार गेली आहे. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये अनेक यंत्रमाग कारखाने आहेत. या कारखान्यातील टॉवेल्स, चादरी परप्रांतात तर जातातच. शिवाय परदेशातही त्याला मोठी मागणी आहे. यामुळे ट्रान्स्पोर्ट नगरी म्हणून शिक्कामोर्तब झालेल्या जोडभावी पेठेत अनेक मालवाहतूक करणाºया नामवंत कंपन्या आहेत. दररोज दोन-अडीचशे ट्रक भरून इथल्या चादरी आणि टॉवेल्स परप्रांतात जात असतात.

काही मालांची मुंबईमार्गे जहाजातून परदेशात निर्यात होत असते. चादरींच्या गाठी अन् टॉवेल्सचे कार्टून ट्रकमध्ये भरताना काश्मिरी माणसं थकत नाहीत. चादरींचा एक गाठ असो अथवा टॉवेल्सचे कार्टून... अगदी पाठीवर घेऊन ते फाकळ्यावरून (फळीवजा शिडी) अलगदपणे ट्रकमध्ये भरतात. काही वेळेतच ट्रक लोड करून त्याचा निरोप घेतात न् घेतात तोच ते दुसºया ट्रकमध्ये माल भरण्याच्या तयारीत असतात. ना कधी कामाची कटकट करतात ना कधी आपली गाºहाणी मांडतात. ट्रान्स्पोर्ट चालकही या मंडळींच्या कामावर जाम खूश असतात. शिफ्टवाईज काम चालत असल्याने प्रत्येकाला थोडी विश्रांती अथवा उसंत मिळते. या लोकांना राहण्याची खास व्यवस्थाही ट्रान्स्पोर्ट चालकांनी केलेली असते. घरातल्या सदस्यांप्रमाणे यांना प्रेम मिळत असल्याने ही मंडळी पूर्णत: इथल्या संस्कृतीत समरस होऊन गेली आहेत. 

डाळ कारखानदारही असतात निश्ंिचत...- सोलापुरात अनेक डाळ कारखाने आहेत. मूग, तूर, हरभरा, मटकी, उडीद आदींवर प्रक्रिया करण्यापासून ते तयार झालेला माल ट्रक, टेम्पोमध्ये भरेपर्यंतचे सर्वच काम राजस्थान, उत्तरप्रदेश, बंगालीदादा अन् बिहारीबाबू करीत असतात. डाळ प्रक्रियेचा अभ्यासही या मंडळींना अवगत आहे. त्यांच्यावर संपूर्ण कारखाना सोपवून गेल्यावरही हे कामगार जणू विश्वासाने काम तडीस नेतात. म्हणूनच डाळ कारखानदारही निश्ंिचत असतात. बिहारीबाबू बलरामसिंग, विश्वजित सांगत होते, ‘साब, शोलापूर हमारे लिये लकी है. चार पैसे मिलते हैं और उसमें से आधा पैसा घरको भेजे देतें हैं. साल-दो साल बाद गाँव लौट जातें हैं!

काम संपल्यावर बनतात एकेक जण आचारी- दिलेले काम वेळेत आटोपून परप्रांतीय कामगार सायंकाळी स्वयंपाकाला लागतात. दररोज जेवण बनविण्याची एकावर जबाबदारी येते. त्याला मदतीसाठी दोघे-तिघे असतात. विशेषत: भात अन् त्याबरोबर एखादी भाजी असली तर कामासाठी आलेले हे सवंगडी अंगत-पगंत करून जेवणाचा लाभ घेतात. या कामगारांच्या आरोग्याची काळजीही डाळ कारखानदार घेत असल्यामुळे दोघांमधील एक वेगळे नाते दिसून येते. 

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायjobनोकरीBiharबिहारUttar Pradeshउत्तर प्रदेश