शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीत आषाढीपूर्वी अधिकारी राबविणार स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 13:25 IST

चला पंढरीसी जाऊ : नियोजन बैठकीत जिल्हाधिकाºयांची सूचना

ठळक मुद्दे पंढरपुरात २३ जुलै रोजी आषाढी वारी सोहळा होणारभूसंपादनाच्या अडचणींमुळे कामे होण्यास वेळ लागत आहेतीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरसाठी ४६७ कोटी रुपये मंजूर

सोलापूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यात स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या. आषाढी वारीपूर्वी आणि आषाढी वारी सोहळ्यानंतर श्रमदानाने पंढरपूरची स्वच्छता केली जाणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज केले.

 आषाढी एकादशी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, आळंदी देवस्थानचे प्रमुख कार्यवाह अजित कुलकर्णी, अभय टिळक, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, शमा ढोक-पवार, सचिन ढोले, प्रवीण साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, कार्यकारी अभियंता विलास मोरे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, रमा जोशी, बाई माने महावितरणचे कार्यकारी अभियंता मधुकर पडळकर आदी उपस्थित होते.

 पंढरपुरात २३ जुलै रोजी आषाढी वारी सोहळा होणार आहे. या सोहळ्यात स्वच्छता, सुरक्षितता, पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्था या बाबींवर प्राधान्याने लक्ष दिले जावे. वारी सोहळ्यातील आवश्यक असणारी अतिक्रमणे काढावी, पालखीच्या मुक्कामाची आणि विसाव्याच्या ठिकाणी मुरमीकरण करून घ्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या.

तीर्थक्षेत्र आराखड्यातून २२७ कोटींचा खर्च- बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पंढरपूरसाठी ४६७ कोटी रुपये मंजूर झाले. यापैकी २४९ कोटींचा निधी प्राप्त झाला असून २२७ कोटी रुपये आजवर खर्च झाले आहेत. यातून पंढरपूर शहरात ८५ कामे करण्यात येत आहेत. यातील ४३ कामे पूर्ण आहेत. २३ कामे प्रगतिपथावर आहेत. १२ ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणींमुळे कामे होण्यास वेळ लागत आहे. ७ कामे वगळण्यात आली आहेत. पालखी मार्गावरही ३१ कामे झाली आहेत. 

पाण्याची व्यवस्था असावी- जिल्हा परिषदेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पालखी तळाच्या परिसरातील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य आहे का, याची आरोग्य विभागामार्फत तपासणी करावी, पाण्याचे स्रोत निश्चित करुन ठेवून पालखी तळ आणि स्रोत यांचे नकाशे तयार करुन घ्यावे. टँकरच्या पुरवठादार आणि चालकाचे मोबाईल क्रमांक पालखी प्रमुखांना उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर