शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

शेतातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता ७२ तासांपेक्षाही अधिक सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 15:56 IST

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक

सोलापूर : अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत अर्थात तीन दिवसांच्या आत संबंधित विमा कंपन्यांना नुकसानीची माहिती कळवणे बंधनकारक आहे. पूर्वीपासून ही अट असून आताही आहे. एखाद्या शेतकऱ्याला ७२ तासांपेक्षा अधिक काळ नुकसानभरपाईची माहिती देण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवू नये, अशी सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे पाच ते दहा दिवसापर्यंत नुकसानीची माहिती गोळा करताना विमा कंपन्या दिसत आहेत. पूर्वीच्या जाचक अटीतून सुटका झाल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपत्ती काळात शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी शासन आणि विमा कंपन्या यांच्या माध्यमातून पिकांवर विमा उतरविला जातो. याचा लाभ लाखो शेतकरी दरवर्षी घेतात. शेतकऱ्यांना उशिरा का होईना विमा कंपन्यांकडून लाभ मिळतो, असे कृषी अधिकारी सांगतात. विमा कंपन्यांच्या निर्देशानुसार नुकसानीची माहिती लवकरात लवकर मोबाईल ॲप, टोल फ्री नंबर वर, ईमेल आयडी तसेच कृषी विभागाकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येते.

..........

असे आहेत पर्याय

  • 1. विमा कंपनीच्या ई-मेल आयडीवर नुकसानीची माहिती भरता येते.
  • 2. तसेच विमा कंपनीने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर देखील माहिती सादर करता येते.
  • 3. यासोबत नुकसानीची माहिती भरण्यासाठी विमा कंपनीने खास मोबाईल ॲप बनविला आहे. या ॲपवर देखील माहिती भरता येते.
  • 4. तसेच कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने देखील नुकसानीची माहिती देता येते.

 

बदल काही नाही

विमा पात्र नुकसानीची रक्कम मिळवण्यासाठी पूर्वी जी अट होती किंवा नियमावली होती. त्याच नियमावली सध्या आहेत. विमा कंपन्यांच्या नियमात काही बदल झाला नाही. मात्र प्रत्येक विमा पात्र शेतकऱ्याला नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कृषी विभाग यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करतो.

- बाळासाहेब शिंदे, कृषी अधीक्षक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीfloodपूरFarmerशेतकरी