शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

शेतातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आता ७२ तासांपेक्षाही अधिक सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 15:56 IST

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक

सोलापूर : अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत अर्थात तीन दिवसांच्या आत संबंधित विमा कंपन्यांना नुकसानीची माहिती कळवणे बंधनकारक आहे. पूर्वीपासून ही अट असून आताही आहे. एखाद्या शेतकऱ्याला ७२ तासांपेक्षा अधिक काळ नुकसानभरपाईची माहिती देण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवू नये, अशी सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे पाच ते दहा दिवसापर्यंत नुकसानीची माहिती गोळा करताना विमा कंपन्या दिसत आहेत. पूर्वीच्या जाचक अटीतून सुटका झाल्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपत्ती काळात शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी शासन आणि विमा कंपन्या यांच्या माध्यमातून पिकांवर विमा उतरविला जातो. याचा लाभ लाखो शेतकरी दरवर्षी घेतात. शेतकऱ्यांना उशिरा का होईना विमा कंपन्यांकडून लाभ मिळतो, असे कृषी अधिकारी सांगतात. विमा कंपन्यांच्या निर्देशानुसार नुकसानीची माहिती लवकरात लवकर मोबाईल ॲप, टोल फ्री नंबर वर, ईमेल आयडी तसेच कृषी विभागाकडे ऑफलाइन पद्धतीने सादर करता येते.

..........

असे आहेत पर्याय

  • 1. विमा कंपनीच्या ई-मेल आयडीवर नुकसानीची माहिती भरता येते.
  • 2. तसेच विमा कंपनीने जाहीर केलेल्या टोल फ्री नंबरवर देखील माहिती सादर करता येते.
  • 3. यासोबत नुकसानीची माहिती भरण्यासाठी विमा कंपनीने खास मोबाईल ॲप बनविला आहे. या ॲपवर देखील माहिती भरता येते.
  • 4. तसेच कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने देखील नुकसानीची माहिती देता येते.

 

बदल काही नाही

विमा पात्र नुकसानीची रक्कम मिळवण्यासाठी पूर्वी जी अट होती किंवा नियमावली होती. त्याच नियमावली सध्या आहेत. विमा कंपन्यांच्या नियमात काही बदल झाला नाही. मात्र प्रत्येक विमा पात्र शेतकऱ्याला नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कृषी विभाग यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करतो.

- बाळासाहेब शिंदे, कृषी अधीक्षक, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीfloodपूरFarmerशेतकरी