शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:29 IST

पंढरपूर आगार; शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

ज्योतीराम शिंदे पंढरपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून एसटीची प्रवासी वाहतूक थांबवली आहे. यामुळे पंढरपूर बस आगाराला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यातच आता फळे, भाजीपाल्यासह इतर मालवाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली तर एसटीच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे. याअगोदरच एसटीची प्रवासी वाहतूक बंद केल्यापासून आजअखेर ३५ हजार ४ फेºयांद्वारे २२ लाख ७७ हजार कि. मी. अंतरावरील प्रवासासाठी ६९ कोटी रुपयांचे पंढरपूर आगाराचे उत्पन्न बुडाले आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २२ मार्चपासून प्रवासी वाहतूक थांबवली होती. यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु शाळा, महाविद्यालये, विवाह सोहळ्यांवर कायम बंदी असल्यामुळे तसेच तालुक्याच्या ठिकाणावरील बाजारपेठ पूर्णपणे खुली झाली नसल्याने प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. याचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. 

२२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू केली असली तरी अजूनही शेकडो बस जागेवरच थांबून आहेत. जिल्ह्यांतर्गत वाहतुकीलाही प्रवाशांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे एसटी बस रिकाम्याच फिरवाव्या लागत आहेत. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी आणि शेतकºयांची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने आता प्रवासी वाहतुकीबरोबरच शेतीमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात- एस.टी. महामंडळाकडून २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे एस.टी. बस रिकाम्याच फिरू लागल्या. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे एस.टी. महामंडळाने शेतकºयांचा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंढरपूर आगाराने १०० बस तैनात केल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला आहे. याला पर्याय म्हणून फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. याचा एस.टी. महामंडळाला फायदाच होईल. यासह विविध उत्पादनांची वाहतूक करण्यास परवानगी दिली तर अजूनही एस.टी. महामंडळाच्या उत्पादन वाढीसाठी याचा उपयोग होईल.- सुधीर सुतारवरिष्ठ आगार व्यवस्थापक, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीBus DriverबसचालकPandharpurपंढरपूर