शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आता ‘लालपरी’ करणार मालवाहतूक; शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:29 IST

पंढरपूर आगार; शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार

ज्योतीराम शिंदे पंढरपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून एसटीची प्रवासी वाहतूक थांबवली आहे. यामुळे पंढरपूर बस आगाराला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यातच आता फळे, भाजीपाल्यासह इतर मालवाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली तर एसटीच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे. याअगोदरच एसटीची प्रवासी वाहतूक बंद केल्यापासून आजअखेर ३५ हजार ४ फेºयांद्वारे २२ लाख ७७ हजार कि. मी. अंतरावरील प्रवासासाठी ६९ कोटी रुपयांचे पंढरपूर आगाराचे उत्पन्न बुडाले आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २२ मार्चपासून प्रवासी वाहतूक थांबवली होती. यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु शाळा, महाविद्यालये, विवाह सोहळ्यांवर कायम बंदी असल्यामुळे तसेच तालुक्याच्या ठिकाणावरील बाजारपेठ पूर्णपणे खुली झाली नसल्याने प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. याचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे. 

२२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू केली असली तरी अजूनही शेकडो बस जागेवरच थांबून आहेत. जिल्ह्यांतर्गत वाहतुकीलाही प्रवाशांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. यामुळे एसटी बस रिकाम्याच फिरवाव्या लागत आहेत. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केली. परंतु त्याला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी आणि शेतकºयांची सोय व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने आता प्रवासी वाहतुकीबरोबरच शेतीमालाची बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

शेतीमाल वाहतुकीसाठी १०० बस तैनात- एस.टी. महामंडळाकडून २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे एस.टी. बस रिकाम्याच फिरू लागल्या. याचा महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे एस.टी. महामंडळाने शेतकºयांचा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंढरपूर आगाराने १०० बस तैनात केल्या आहेत. यामुळे शेतकºयांच्या शेतातील माल बाजारपेठेपर्यंत नेणे सोयीचे होणार असल्याचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला आहे. याला पर्याय म्हणून फळे, भाजीपाल्यासह इतर शेतीउत्पादने वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. याचा एस.टी. महामंडळाला फायदाच होईल. यासह विविध उत्पादनांची वाहतूक करण्यास परवानगी दिली तर अजूनही एस.टी. महामंडळाच्या उत्पादन वाढीसाठी याचा उपयोग होईल.- सुधीर सुतारवरिष्ठ आगार व्यवस्थापक, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीBus DriverबसचालकPandharpurपंढरपूर