शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

सोलापूर जिल्ह्यातील ४७ गावांमध्ये नाही नळपाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:20 IST

जलजीवन मिशनचा अंमल; नव्याने अधिकाºयांची नियुक्ती

सोलापूर : जिल्ह्यात अद्याप ४७ गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजना नाही. सन २०२४ पर्यंत सर्व गावे नळपाणीपुरवठा योजनेने जोडण्याचे उद्दिष्ट असून, ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रिक्त पदांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यात १0२९ गावे आहेत. यातील १0८७ गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजना आहे, उर्वरित ४७ गावांमध्ये अद्याप पाणीपुरवठा योजना राबविलेली नाही. केंद्र शासनाने जलजीवन मिशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत २0२४ पर्यंत सर्व खेड्यांमधील प्रत्येक घरात नळाचे पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेनुसार या उर्वरित गावात नळपाणीपुरवठा योजना राबवायची आहे. या योजनेत उर्वरित गावांचा आराखडा सादर करण्यात आला आहे अशी माहिती प्रभारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी दिली.

जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन योजना राबविली जाणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या विभागातील रिक्त पदांवर गुरुवारी जीवन प्राधिकरणकडील कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरसाठी पी. सी. भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषदेकडील लघु पाटबंधारे विभागाचे पद रिक्तच आहे.

स्वच्छ भारत मिशनचे काय...ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी यापूर्वी जलस्वराज्य योजना राबविली गेली होती. जिल्हा परिषदेत याचे दोन भाग आहेत. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडे नव्याने अधिकारी नियुक्त झाले आहेत. या विभागात कंत्राटी कर्मचारी आहेत. पण जलजीवनचे कर्मचारी नियुक्त झाल्यावरच काम सुरू होणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकGovernmentसरकार