शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नवा प्रयोग, ज्वारीपासून बनणार पास्ता, बिस्कीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 12:40 IST

आत्मनिर्भर अन्न प्रक्रिया योजना: १२१ शेतकऱ्यांनी केला कृषी विभागाकडे अर्ज

राजकुमार सारोळे

सोलापूर : ज्वारीपासून आत्तापर्यंत कडक भाकरी, कुरवड्या, पापड बनविले जात होते. पण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता नवे मार्केटिंग आत्मसात केले असून, केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेतून कर्ज घेऊन बिस्किट, पास्ता, रवा बनविण्याचे कारखाने शेतात उभारण्याची तयारी केली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील १२१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना आणली आहे. सोलापूर जिल्हा रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारणीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ज्वारीवर प्राथमिक, दुय्यम प्रक्रिया करून अन्न उद्योग उभारू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के किंवा जास्तीतजास्त १० लाख अनुदान दिले जाणार आहे. माढा, बार्शी, करमाळा तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले आहेत असे कृषी विभागातील प्रकल्प समन्वयक एम. ए. पठाण यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी अर्ज करताना कोणता उद्योग उभारणार याचा प्रकल्प अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी नुसतेच अर्ज केले आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रकल्प सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्वारीपासून नवीन कोणते पदार्थ बनविता येतील याची वेबसाईटवर माहिती घेतली व पास्ता बनविण्याचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे मंगळवेढ्याचे शेतकरी मयूर भोसले यांनी सांगितले. माढा व करमाळ्यातील शेतकऱ्यांनी बिस्किट, रवा, पापड, कुरवड्या बनविण्याचे प्रस्ताव दिले आहेत.

तालुकानिहाय उद्दिष्ट...

  • उत्तर सोलापूर: १०
  • दक्षिण सोलापूर: १०
  • मोहोळ: १०
  • अक्कलकोट: १०
  • पंढरपूर: १०
  • माळशिरस: १०
  • मंगळवेढा:१०
  • सांगोला: १०
  • माढा: ५०
  • करमाळा: १५

कोणाला घेता येणार लाभ?

ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारू इच्छिणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यास कृषी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचबरोबर कंपनी, गटशेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी भागिदारी किंवा भाड्याची जागा असेल तर तसा करार जोडणे अपेक्षित आहे. उद्योगास कर्ज देऊ इच्छिणाऱ्या बँका अर्जदारानेच निवडायच्या आहेत. कृषी विभाग फक्त अनुदानासाठी प्रकल्प शिफारस करेल. असा करा अर्ज

०कृषी विभागाच्या पीएमएफएमई या वेबसाईटवर जाऊन अर्ज ओपन करायचा आहे. या अर्जात नावासह सर्व माहिती अचूक भरायची आहे. सोबत सात बारा, आधार, पॅनकार्ड, प्रकल्प अहवाल जोडायचे आहेत.

०अर्जासोबत प्रकल्प अहवाल अपलोड नसेल तरी अर्ज सबमिट होतो. कृषी विभाग याची नोंद घेऊन संबंधित शेतकऱ्यास प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मदत करतो. उद्योग, जागा, मशिनरी, बँक या गोष्टी शेतकऱ्यांनेच निवडायच्या आहेत.

 

आत्मनिर्भर भारत अंतर्गत सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेत सोलापूर जिल्ह्यासाठी ज्वारीची निवड झाली आहे. ज्वारीवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी १२१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अजूनही शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. १५ शेतकऱ्यांचे उद्योग निवडले असून, त्यांना तातडीने कर्ज देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेतली जाणार आहे.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी