शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

सोलापुरातील पोस्ट कोविडचे दुर्लक्षित रुग्ण केवळ ‘सिव्हिल’च्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:09 IST

नियमित तपासणी नाही : तिघांच्या मृत्यूनंतरही तक्रार नसल्याचा डॉक्टरांचा दावा

ठळक मुद्देग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाहीकोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते

राजकुमार सारोळेलापूर : कोरोना संसर्गानंतर पोस्ट कोवीडमुळे शहरात तिघांचा मृत्यू झाला तर ग्रामीणमध्ये एकही घटना आरोग्य विभागापर्यंत आलेली नाही. असे असतानाही पोस्ट कोवीड रुग्णांना वार्यावर सोडले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. बऱ्याचदा मायकोकार्डायटीससारखा हृदयाचा आजारही जाणवतो. डायबिटीस, हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात. स्कीन रॅश येणे किंवा  मानसिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आढळते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव  यांनी दिली.

शहरात पोस्ट कोवीड रुग्ण  शासकीय रुग्णालयाच्या भरोशावर सोडले गेले आहेत. ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय केली आहे पण खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांना रुग्णांची तपासणी केली जात नाही. आरोग्य केंद्रातही असे रुग्ण उपचारास येत नसल्याचे दिसून आले.

रक्ताचे नमुने घेतले जातातग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाही. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधीत रुग्णांचे रक्त तपासणीला घेतले जात आहे. शहरात मात्र अशी सोय दिसून आली नाही.

दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही..पोस्ट कोविड रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा रुग्णांची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य सेवक त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. आरोग्य केंद्रात उपचाराची सोय नेहमीच्या ओपीडीत केली आहे. दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय