शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

सोलापुरातील पोस्ट कोविडचे दुर्लक्षित रुग्ण केवळ ‘सिव्हिल’च्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:09 IST

नियमित तपासणी नाही : तिघांच्या मृत्यूनंतरही तक्रार नसल्याचा डॉक्टरांचा दावा

ठळक मुद्देग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाहीकोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते

राजकुमार सारोळेलापूर : कोरोना संसर्गानंतर पोस्ट कोवीडमुळे शहरात तिघांचा मृत्यू झाला तर ग्रामीणमध्ये एकही घटना आरोग्य विभागापर्यंत आलेली नाही. असे असतानाही पोस्ट कोवीड रुग्णांना वार्यावर सोडले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. बऱ्याचदा मायकोकार्डायटीससारखा हृदयाचा आजारही जाणवतो. डायबिटीस, हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात. स्कीन रॅश येणे किंवा  मानसिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आढळते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव  यांनी दिली.

शहरात पोस्ट कोवीड रुग्ण  शासकीय रुग्णालयाच्या भरोशावर सोडले गेले आहेत. ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय केली आहे पण खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांना रुग्णांची तपासणी केली जात नाही. आरोग्य केंद्रातही असे रुग्ण उपचारास येत नसल्याचे दिसून आले.

रक्ताचे नमुने घेतले जातातग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाही. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधीत रुग्णांचे रक्त तपासणीला घेतले जात आहे. शहरात मात्र अशी सोय दिसून आली नाही.

दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही..पोस्ट कोविड रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा रुग्णांची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य सेवक त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. आरोग्य केंद्रात उपचाराची सोय नेहमीच्या ओपीडीत केली आहे. दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय