शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

वक्तृत्व कला संपादनासाठी आत्मविश्वासाची गरज, राजेंद्र बीडकर यांचे मत,  सोलापूरातील वालचंद महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:22 IST

श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र बीडकर बोलत होते.

ठळक मुद्देवक्तृत्व कला साध्य करण्यासाठी अवांतर वाचनाने शब्दभांडार वाढविणे, विचार यावर वक्त्याच्या  वाणीला  प्रतिसाद मिळतो.सकारात्मक, सात्विक, अहिंसात्मक विचारसरणी जोपासावी : डॉ. बीडकर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : वक्तृत्व ही कला मानवाला निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणगी आहे. अमोघ वाणीच्या बळावर देदीप्यमान कार्य घडवून आणता येते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा सगळ्याच स्तरावर वक्तृत्वाच्या प्रभावी अस्त्राचा उपयोग करून दणदणीत यश संपादन करणे शक्य आहे. उत्कृष्ट वक्त्यांचे वक्तृत्व एकणे आणि प्रयत्नाला सातत्याबरोबर आत्मविश्वासाची जोड देणे शक्य झाले की ही कला अवगत करता येते, असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापक डॉ. राजेंद्र बीडकर यांनी केले. श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र बीडकर बोलत होते. यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शहा, पराग शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्राचार्य डॉ. शिवकुमार गणापूर, प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, प्रा. बाजीराव अहिरे, माजी प्राचार्य डॉ. आर.आर. शहा, डॉ. राजशेखर हिरेमठ, यशवंत बोधे आदी उपस्थित होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जन्मजात वक्तृत्वसंपन्न नेत्यांच्या उदाहरणांबरोबर उच्चार सुस्पष्ट नसलेला ग्रीक वक्ता सिसोरी यांनी परिश्रमातून प्राप्त केलेल्या अमोघ वाणीची उदाहरणे देत डॉ. बीडकर म्हणाले की, वक्तृत्व कला साध्य करण्यासाठी अवांतर वाचनाने शब्दभांडार वाढविणे, विचार यावर वक्त्याच्या  वाणीला  प्रतिसाद मिळतो. त्यामुळे सकारात्मक, सात्विक, अहिंसात्मक विचारसरणी जोपासावी, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. पी.एस. देवसाळे यांनी केले तर आभार डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी मानले. 

टॅग्स :Solapurसोलापूर