शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

इतिहासाचे पुनर्लेखन करताना सम्यक दृष्टिकोन आवश्यक, आ़ ह़ साळुंखे यांचे मत, सोलापूरात समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:51 IST

प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़ 

ठळक मुद्देवालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रातील समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रगौतम बुद्धांपासून अमर्त्य सेनापर्यंत अनेक उदाहरणे देत डॉ़ साळुंखे यांनी सामाजिक शास्त्रासमोर उभ्या असलेल्या शेतकरी आत्महत्या, आर्थिक विषमता, स्त्रीभू्रणहत्या, जातीय व धार्मिक असहिष्णुता आदी ज्वलंत विषयांचा ऊहापोह केला़ स्वत:च्या धडावर स्वत:चे डोके असण्याचे भान समाजशास्त्रांच्या तर्क निष्ठ अभ्यासातून प्राप्त होते़ : डॉ़ चंद्रकांत चव्हाण

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़ वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रातील समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ याप्रसंगी विश्वस्त भूषण शहा, प्ऱ प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण, समन्वयक डॉ़ धनराज पाटील, डॉ़ सिद्राम सलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती़आपल्या अभ्यासपूर्ण बीजभाषणात तथागत गौतम बुद्धांपासून अमर्त्य सेनापर्यंत अनेक उदाहरणे देत डॉ़ साळुंखे यांनी सामाजिक शास्त्रासमोर उभ्या असलेल्या शेतकरी आत्महत्या, आर्थिक विषमता, स्त्रीभू्रणहत्या, जातीय व धार्मिक असहिष्णुता आदी ज्वलंत विषयांचा ऊहापोह केला़ समाजाला दिशा देण्याचे काम प्राध्यापकांचे असल्याचेही ते म्हणाले़ प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण म्हणाले, स्वत:च्या धडावर स्वत:चे डोके असण्याचे भान समाजशास्त्रांच्या तर्क निष्ठ अभ्यासातून प्राप्त होते़ मनुष्य हा समाजशील प्राणी असून मानवी विकासात समाजशास्त्राचे योगदान महत्त्वाचे आहे़ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ़ धनराज पाटील यांनी केले तर अतिथींचा परिचय डॉ़ अशोक गायकवाड यांनी करून दिला़ सूत्रसंचालन प्रा़ मनोहर जोशी यांनी केले तर आभार डॉ़ संगमेश्वर नीला यांनी मानले़ यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूर