शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात चंद्रभागेतील दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफचे पथक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:24 IST

पंढरपुरात कार्तिकी वारीची तयारी;  नदी दुथडी भरून वाहतेय, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक सर्तक

ठळक मुद्देकार्तिकी यात्रेची तयारी प्रशासनाकडून सुरू जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या परतीच्या पावसामुळे यंदा प्रथम कार्तिकी यात्रेदरम्यानही चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे

पंढरपूर : गेल्या तीन महिन्यांपासून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय शुक्रवारी कार्तिकी वारी आहे. या वारीसाठी पंढरीत लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. हे भाविक प्रथम चंद्रभागेत पवित्र स्नान करतात़ स्नान करताना दुर्घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत यंदा प्रथमच प्रशासनाने एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे. हे पथक ५ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

यावर्षी आॅगस्ट आणि आॅक्टोबर महिन्यात अशा दोनवेळा चंद्रभागा नदीला पूर आला होता़ सलग तीन महिने चंद्रभागा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे़ दरम्यानच्या काळात पंढरीत आलेले भाविक स्नान करताना पाय घसरून किंवा पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती़  सध्याही चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. शिवाय कार्तिक वारी सोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक येतात़ त्या पार्श्वभूमीवर दुर्घटना टाळण्यासाठी एनडीआरएफच्या पथकास पाचारण करण्यात आले आहे.

कार्तिकी यात्रेची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बैठक घेऊन सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. परतीच्या पावसामुळे यंदा प्रथम कार्तिकी यात्रेदरम्यानही चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रभागा पात्र पूर्णपणे पाण्याने व्यापले आहे. एकादशी सोहळ्यासाठी आल्यानंतर भाविक चंद्रभागा स्नानासाठी जात असतात. अशावेळी कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी एनडीआरएफ, अकोला येथील संस्थेचे स्वयंसेवक तसेच ५० जीवरक्षकही यात्रा काळात नदीपात्राच्या ठिकाणी कार्यरत असतील.  ५ नोव्हेंबर नंतर या टीम पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. 

सध्या घाटाच्या ठिकाणांहून होड्या चालविण्यात येत आहेत. त्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोक बसू नयेत यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रा काळात नागरिकांना आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोळी बांधवही असतील मदतीला- पंढरपुरातील चंद्रभागेत सुमारे २०० होड्या आहेत. जेव्हा जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा कोळी बांधवांनी प्रशासनाला मदत केली आहे. आताही कार्तिकी वारी सोहळ्यादरम्यान यामुळे प्रथमच एनआरडीएफचे पथक येणार आहे. त्यांच्या मदतीला कोळी बांधव असतील. सध्या चंद्रभागेचे पाणी घाटापर्यंत आहे. शिवाय काही स्वीमरही तयार आहेत, अशी माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरriverनदी