शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

निसर्गप्रेमींची हाक; मुठभर दाणे अन् ओंजळभर पाणी; पक्षी-प्राण्यांसाठी अभियान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:46 IST

सोलापूर : विदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय. या असह्य उन्हापासून ...

ठळक मुद्देघरासमोर, टेरेसवर पाणी भरलेले भांडे अन् शेतात करा पाणवठेविदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय.

सोलापूर: विदर्भानंतर नेहमीच उन्हाच्या काहिलीनं त्राही त्राही करून सोडणारा उन्हाळा आता सोलापूरकरांना नेहमीचाच परिचित बनलाय. या असह्य उन्हापासून प्रत्येक जण आपल्या परीनं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र मुक्या पक्ष्यांचं.. रानावनात भटकंती करणाºया प्राण्यांचं काय? नेमका हाच प्रश्न घेऊन निसर्ग माझा सखा परिवार आणि अन्य निसर्गप्रेमींनी ‘मुठभर दाणे अन् ओंझळभर पाणी’ या अभियानाद्वारे सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.

आज माणसाचं निसर्गाकडे कळत-नकळत होणारं दुर्लक्ष आणि त्यामुळे दिवसेंदिवस कमी होणारं पावसाचं प्रमाण याचा मनुष्याबरोबरच मुक्या बिचाºया वन्यजीव प्राणी अन् पक्ष्यांनाही होतोय. याची जाणीव आपल्या सर्वांनाच असणे गरजेचे आहे. पक्षी उडत असल्याने त्यांची पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. चांगले पाणी मिळाले तर त्यांची पचनसंस्था व्यवस्थित राहते. बºयाच वेळेस पाण्याअभावी ग्लानी येऊन खाली पडण्याचे प्रकारही घडतात, असे आवाहन ‘निसर्ग माझा सखा’चे अरविंद म्हेत्रे यांनी केले.

काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ आणि ‘निसर्ग माझा सखा’च्या वतीने चिमणीसाठी कृत्रिम घरटी बनविण्याचे प्रशिक्षण दिलं गेलं. शेकडो घरटी बसविण्यात आली. चिमण्यांनी जवळपास बहुतांश घरटी स्वीकारल्याचे दिसून आले. या घरट्यांच्या माध्यमातून चिमण्यांचा अधिवास झाला. अनेक घरट्यांमध्ये पिलं दिसून येताहेत, असे म्हेत्रे यांनी सांगितले.

कोणत्याही ऋतूमध्ये विशेषत: उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी आपल्या शेतामध्ये झाडाखाली ‘पाणथळे’ बनवावेत. प्रत्येकाने आपल्या घरासमोर पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवावे, त्यांच्यासाठी घरटी बसवावीत. त्यांना खायला नैसर्गिक अन्न ठेवायला हवं. या पृथ्वीतलावर मानवाला राहण्याचा जितका अधिकार आहे तितकाच प्रत्येक सजीवाला आहे. त्यामुळे एक कर्तव्य म्हणून आपण या साºया गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे वन्यजीव प्रेमी मुकुंद शेटे यांनी सांगितले.

सोलापूरकरहो, घ्या मनावर!- दैनंदिन जीवनात आपण पाण्याचा वापर किती आणि कसा करतो, याचा विचार करूयात. किमान एक ग्लास पाणी पिण्यासाठी घेता, त्यातला किमान पाव हिस्सा तरी पाणी आपण सांडतो. आता उन्हाळ्यात पाणी जपून वापरा अन् सांडणारे पाणी वाचवून प्रत्येकाने किमान एकतरी ग्लास आपल्या छतावर ठेवले तर पाण्यासाठी भटकंती करणाºया चिऊतार्इंसह अनेक पक्ष्यांची तहान भागू शकते. तर आजपासून प्रत्येकानेच मनावर घ्यावं, असं आवाहन निसर्गप्रेमींनी केलं आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानbirds sanctuaryपक्षी अभयारण्य