शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

नाना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात म्हणजे चर्चा तर होणारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 14:24 IST

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण; भेटीचे कारण साखर कारखान्याचे,  खलबते मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर

ठळक मुद्देपंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आ. भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. याबाबत आ. भालके यांना विचारले असता, ‘लोक काहीही चर्चा करतात’ असे ते म्हणाले

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साखर कारखान्याच्या कामाबाबत चर्चा केली. त्यांच्या भेटीतील विषय कोणताही असो, पण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याने ‘नाना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात म्हणजे चर्चा तर होणारच!’, अशी चर्चा पंढरपूर, मंगळवेढ्यात रंगू लागली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ४ जून रोजी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आ. भारत भालके हेही उपस्थित होते. शिवाय आ. भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. याबाबत आ. भालके यांना विचारले असता, ‘लोक काहीही चर्चा करतात’ असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांशी माढ्याचे खा़  रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील, स़ शि़ वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी भेट घेऊन चर्चा केली होती.  त्यांनीही अशीच उत्तरे दिली होती़ त्यानंतर त्या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला़ ही काही खूप जुनी गोष्ट नाही़ ही घटना ताजी असतानाच आता मुख्यमंत्र्यांना आ. भारत भालके भेटून चर्चा करतात़ त्यामुळे तेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार ? अशी नागरिकांमधून चर्चा होणे स्वाभाविक आहे़ आ़ भारत भालके हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यावर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी मिळणार  का? अशीही चर्चा आहे़ परंतु हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे़ त्यामुळे ही जागा शिवसेना भाजपला सोडणार का? आ़ भारत भालके यांना उमेदवारी दिली तर आ़ प्रशांत परिचारक, शिवसेना महिला आघाडीप्रमुख शैला गोडसे, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे काय होणार? अशीही चर्चा झडत आहे.

राहिला प्रश्न तो आ़ प्रशांत परिचारक यांचा़ त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी द्यायची, गतवेळेला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या सर्वाधिक असतानाही आ़ प्रशांत परिचारक हे दीपक साळुंके यांना पराभूत करून विजयी झाले होते. आता तर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे़ त्यामुळे आ़ प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर सहजासहजी विजयी होतील.

शैला गोडसे या विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी वर्षभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला़ तेव्हापासून त्या मतदारसंघात प्रचार दौरा करीत आहेत़ मात्र त्यांना पदवीधर मतदारसंघ देऊन त्यांचीही अडसर दूर करायची, असे गृहित धरून आ. भारत भालके यांना भाजपमध्ये घेऊन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याची चर्चा दोन्ही तालुक्यात आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्नपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लोकसभेला काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे़ आ़ भारत भालके यांच्या मतदारांशी थेट संपर्कामुळे शक्य झाल्याचे बोलले जाते़ त्यामुळे आ़ भारत भालके यांना भाजपमध्ये घेऊन ही जागाही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून भाजपला घ्यायची आणि आ़ भारत भालके यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव असल्याची चर्चा आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९madha-pcमाढाPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस