शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सोलापूरच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण

By appasaheb.patil | Updated: November 3, 2023 16:10 IST

सोलापूर जिल्हा जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अत्यल्प पावसाने शेतकरी, जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी काही ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत तर पेरण्या झालेल्या पिकांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. 

सोलापूर जिल्हा हा प्रमुख कृषी उत्पादक म्हणून प्रसिध्द आहे. विशेषतः डाळिंब, केळी , द्राक्षे इ. फलोत्पादनाचे वाढते उत्पादन लक्षात घेता सोलापूर हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. खरीप आणि रबी हंगामातील पिकांचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.  परंतु, चालू वर्षी सोलापूर लोकसभा मतदार संघातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यात सरासरी ही पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांची परिस्थिती उत्तम नसल्याने पाण्याअभावी पिके जळून जात आहेत.

दरम्यान, येणाऱ्या दिवाळी सणाच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. उजनी धरणाच्या जलसाठ्यात ही वाढ नसल्याने सिंचनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना विशेषतः मोठ्या संख्येने असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी अधिक संकटग्रस्त झाला आहे. तसेच सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे ही संकट येणाऱ्या काळात उभे राहणार आहे. त्यामुळे  या मागणीचा विचार करून सोलापूर जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याची मागणी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSolapurसोलापूर