शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

कोरोनामुळे मध्यमवर्गीयांचे मृत्यू अधिक; श्रमिकांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 11:58 IST

कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण; खासगी दवाखान्यात उपचार उपलब्ध नसल्याचाही फटका

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना एक किंवा एकापेक्षा अधिक आजार ५० वर्षांवरील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना एकही आजार नाही७० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून दोन दिवसांत आणि ८५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून पाच दिवसांत

समीर इनामदार

सोलापूर : सोलापुरात वाढलेल्या मृत्यूंमध्ये मध्यमवर्गीय नागरिकांचे विशेषत: श्रमिक कामगारांचे प्रमाण अधिक आहे. कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

मृत्युमुखी पडलेल्यांचा सामाजिक विचार केल्यानंतर यामध्ये रोजंदारीवर जाणाºया नागरिकांचा समावेश आहे. अशा नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते स्वत:च्या आरोग्याकडे फारसे गांभीर्याने पाहू शकत नाहीत. ‘रोज आणावे तेव्हा खावे’ अशी परिस्थिती असल्याने त्यांना कामावर जावे लागते. त्यामुळे अशा नागरिकांना औषधे आणणेदेखील परवडणारे नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये सारीच्या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या साधारणत: ७९ इतकी आहे. गतवर्षी सारीमुळे मरण पावलेल्यांची संख्या ही या दोन महिन्यांत ५९ इतकी होती. खासगी दवाखाने उपलब्ध नसल्याने यंदा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे यात म्हटले आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले सुमारे ८९ टक्के नागरिक हे लोकसंख्येची अत्यंत जास्त घनता असलेल्या भागात राहतात. यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणावर झाला आहे. 

त्याचप्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या ३४ नागरिकांमध्ये जवळपास ८९ टक्क्यांहून अधिक प्रमाण हे ५० वर्षांवरील वयोगटातील आहे. त्याचवेळी ११ टक्के इतके प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांचे आहे. ५० कमी वय असलेल्या नागरिकांनाही इतर आजाराने ग्रासल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण हे अधिक वय आणि आजारांमुळे झाल्याचे निष्पन्न होते. 

यातील ७० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून दोन दिवसांत आणि ८५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून पाच दिवसांत झालेले आहेत. रुग्णालयात उशिरा दाखल होणे, हे त्यांच्या मृत्यूमागचे आणखी एक कारण असू शकते, असे यात म्हटले आहे.

५० वर्षांवरील वय...- कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना एक किंवा एकापेक्षा अधिक आजार होते. उर्वरित मृतांचे वय झालेले होते. ५० वर्षांवरील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना एकही आजार नाही, असे झालेले नाही. वयोवृद्ध झालेल्या नागरिकांचा मृत्यू अन्य दुसºयाही कारणास्तव झाला असता, त्यामुळे ते कोरोनामुळेच वारले, असे म्हणता येणार नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस