शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कोरोनामुळे मध्यमवर्गीयांचे मृत्यू अधिक; श्रमिकांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 11:58 IST

कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण; खासगी दवाखान्यात उपचार उपलब्ध नसल्याचाही फटका

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना एक किंवा एकापेक्षा अधिक आजार ५० वर्षांवरील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना एकही आजार नाही७० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून दोन दिवसांत आणि ८५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून पाच दिवसांत

समीर इनामदार

सोलापूर : सोलापुरात वाढलेल्या मृत्यूंमध्ये मध्यमवर्गीय नागरिकांचे विशेषत: श्रमिक कामगारांचे प्रमाण अधिक आहे. कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

मृत्युमुखी पडलेल्यांचा सामाजिक विचार केल्यानंतर यामध्ये रोजंदारीवर जाणाºया नागरिकांचा समावेश आहे. अशा नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते स्वत:च्या आरोग्याकडे फारसे गांभीर्याने पाहू शकत नाहीत. ‘रोज आणावे तेव्हा खावे’ अशी परिस्थिती असल्याने त्यांना कामावर जावे लागते. त्यामुळे अशा नागरिकांना औषधे आणणेदेखील परवडणारे नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये सारीच्या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या साधारणत: ७९ इतकी आहे. गतवर्षी सारीमुळे मरण पावलेल्यांची संख्या ही या दोन महिन्यांत ५९ इतकी होती. खासगी दवाखाने उपलब्ध नसल्याने यंदा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे यात म्हटले आहे.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले सुमारे ८९ टक्के नागरिक हे लोकसंख्येची अत्यंत जास्त घनता असलेल्या भागात राहतात. यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणावर झाला आहे. 

त्याचप्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या ३४ नागरिकांमध्ये जवळपास ८९ टक्क्यांहून अधिक प्रमाण हे ५० वर्षांवरील वयोगटातील आहे. त्याचवेळी ११ टक्के इतके प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांचे आहे. ५० कमी वय असलेल्या नागरिकांनाही इतर आजाराने ग्रासल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण हे अधिक वय आणि आजारांमुळे झाल्याचे निष्पन्न होते. 

यातील ७० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून दोन दिवसांत आणि ८५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून पाच दिवसांत झालेले आहेत. रुग्णालयात उशिरा दाखल होणे, हे त्यांच्या मृत्यूमागचे आणखी एक कारण असू शकते, असे यात म्हटले आहे.

५० वर्षांवरील वय...- कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना एक किंवा एकापेक्षा अधिक आजार होते. उर्वरित मृतांचे वय झालेले होते. ५० वर्षांवरील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना एकही आजार नाही, असे झालेले नाही. वयोवृद्ध झालेल्या नागरिकांचा मृत्यू अन्य दुसºयाही कारणास्तव झाला असता, त्यामुळे ते कोरोनामुळेच वारले, असे म्हणता येणार नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस