शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

राज्यातील दोनशेपेक्षा अधिक साखर कारखान्यांकडून यंदा होणार गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:56 IST

राज्यातील उच्चांकी संख्या; १९८ कारखान्यांचे परवाना अर्ज दाखल

ठळक मुद्दे२०१८-१९ मध्ये राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होतायंदा सुरू होणाºया कारखान्यांची संख्या वाढल्याने अधिक लोकांना रोजगार मिळणारसोलापूर जिल्ह्यातील २९ व उस्मानाबादचे ११ अशा ४० साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले

सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामासाठी राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी परवाने अर्ज दाखल केले असून, या संख्येत आणखी वाढ होऊन दोनशेहून अधिक  कारखान्यांकडून यंदा गाळप होईल. आजवरच्या हंगामातील ही संख्या सर्वाधिक आहे. यापूर्वी  १९५ कारखाने सुरू झाले होते.

साखर कारखाने सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांचा रितसर परवाना घ्यावा लागतो. गाळपाच्या परवान्यासाठीचे अर्ज राज्यातील आठ प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे आले आहेत. साखर आयुक्त कार्यालयात या अर्जांची तपासणी केली जाते. यामध्ये मागील हंगामाची एफआरपी चुकती केली आहे का?, शिवाय इतर देणे असल्याच्या तक्रारी आहेत का?, या बाबी पाहूनच गाळप परवाना मिळतो. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडून ९३ कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाला सादर झाले आहेत. त्यापैकी २२ साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला असल्याचे सांगण्यात आले.

पुढील आठवड्यात यापैकी बहुतेक कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार आहे. गाळप परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी आॅगस्ट व सप्टेंबर अशी दोन महिने मुदत दिली होती; मात्र त्यानंतरही अर्ज केला तर गाळप परवाना दिला जाणार आहे. त्यामुळे आणखीन काही कारखाने गाळपासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. मागील वर्षी राज्यात उसाचे क्षेत्र फारच कमी होते. त्यामुळे अवघे १४७ कारखाने सुरू झाले होते. यावर्षी ८७४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल असा अंदाज आहे. 

सोलापूर, उस्मानाबादसाठी ४० अर्ज२०१८-१९ मध्ये राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. हा आकडा उच्चांकी होता. यंदा सुरू होणाºया कारखान्यांची संख्या वाढल्याने अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान, सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे सोलापूर जिल्ह्यातील २९ व उस्मानाबादचे ११ अशा ४० साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. लोकमंगल उद्योग समूहाचे तीन, मातोश्री लक्ष्मी शुगर, फॅबटेक, आदिनाथ व इतर असे सहा ते सात कारखाने अर्ज करू शकतात. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेती