शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

रमजान महिन्यात पाणीदार फळांना मागणी जास्त

By appasaheb.patil | Updated: May 16, 2019 12:58 IST

रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली.

ठळक मुद्देरमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला यंदा आवक कमी असली तरी म्हणावे तसे भाव वाढले नाहीतसोलापूर जिल्ह्यातील विविध भागांसह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून फळे विक्रीसाठी सोलापुरात येत आहेत.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : एकीकडे रखरखते ऊन... अन् दुसरीकडे रमजानचे रोजे. दिवसभर उपासीपोटी दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी मुस्लीम बांधव फळांचा आस्वाद घेऊन रोजे सोडतात. सध्या पवित्र रमजान महिन्यात पाणीदार फळांना विशेष मागणी आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात कमी प्रमाणात फळे दाखल होत असल्याने फळांच्या भावात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ याशिवाय मागणीअभावी डाळिंब, पेरूच्या भावात घट झाल्याची माहिती फळविक्रेते रिजवान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली आहे़ यंदाही रमजानच्या पार्श्वभूमीवर मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी व्यापाºयांची विविध फळांच्या उपलब्धतेसाठी धावपळ होत आहे़ दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन आणि आवक घटल्याने बहुतांश फळांचे भाव यंदा तेजीत आहेत. सामान्य ग्राहक रमजानमध्ये स्वस्तातील केळीला जास्त पसंती देत असल्याची माहिती फळविक्रेते रिजवान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ विविध फळबाजारातील व्यापाºयांनी केळी खरेदीवर भर दिला आहे. परप्रांतातून अन् विदेशातून मोठ्या प्रमाणावर फळे आली आहेत. 

उत्पादकांमध्ये समाधान...- यंदा पाणीटंचाई आणि अति तापमान यामुळे उन्हाळ्यात केळीच्या बागा जगविणे मुश्कील होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे शेतकºयांनी तेजीचा फायदा उचलून केळीबागा लवकर खाली करण्यावर लक्ष केंद्रित केले़ रमजान महिन्यात केळीला मागणी जास्त आहे़ पौष्टीक व स्वस्त असल्याने रोजा (उपवास) सोडताना सर्रास मुस्लीम बांधव केळीचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे़ संपूर्ण रमजान महिन्यात केळीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले़ 

पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना मागणी- मुस्लीम धर्मीयांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू झाला आहे़ या काळात मुस्लीम बांधवात पहाटेपासून ठेवण्यात आलेले रोजे (उपवास) संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. रोजा सोडताना सर्वसाधारणपणे जड पदार्थ न खाता ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे ती फळे खाण्याची एक पद्धत प्रचलित आहे. दिवसभर पाण्याचा एक थेंब न पिण्याचाही नियम रोजा काळात पाळला जातो. त्यामुळे संध्याकाळी रोजा सोडताना केळी, कलिंगड, पपई, डाळिंब, अननस, टरबूज या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.

पाणीदार फळांची आवक निम्म्यावर- पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील काही शेतकरी रमजान महिन्यात पाणीदार फळे बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करतात़ कारण या काळात त्यांच्या मालाला चांगला भाव देखील मिळतो़ दुष्काळामुळे आवक कमी असल्यामुळे फळांना चांगला भाव मिळतो़ परिणामी शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होते़ यंदा या फळांवर पाणीटंचाईचे संकट असले तरी बाजारात फळांची आवक चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे़ रमजान काळात येणाºया या पाणीदार फळांची आवक निम्म्यावर आली असून, त्यांचे दर वाढत असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले़

रमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला आहे़ यंदा आवक कमी असली तरी म्हणावे तसे भाव वाढले नाहीत़ शहरातील विविध मशिदीमधील मुस्लीम बांधवांना रोजा सोडण्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांकडून फळांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे़ सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांसह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून फळे विक्रीसाठी सोलापुरात येत आहेत.- सुलतान शेखफळविक्रेता, सोलापूर

फळ                          घाऊक    किरकोळ (दर प्रति किलो रुपयात)सफरचंद                      ५५        १५० ते २००पेरू                              ४६        १००मोसंबी                          १६        ५० ते ६०पपई                            २०        ४५चिकू                             ३५        ६५संत्री                                २४        ५० ते ६०केळी (डझन)                    २०        ३० ते ३५कलिंगड (नग)                १५        ३० ते ३५पपई (नग)                     १० ते १२        १० 

टॅग्स :SolapurसोलापूरfruitsफळेRamadanरमजानAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार