शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
4
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
5
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
6
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
7
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
8
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
9
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
10
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
11
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
12
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
13
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
14
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
15
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
16
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
17
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
18
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
19
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
20
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक

मोहोळ विधानसभा; राखीव असूनही इच्छुकांची भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 13:03 IST

राजकीय समीकरण; जागा शिवसेना की भाजपला यावर बरीच गणितं अवलंबून

ठळक मुद्दे राखीव असणाºया मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजप व वंचितसह सर्वच पक्षातून स्थानिक उमेदवारांसह बाहेरून येणाºयांची  संख्या ढीगभरकोणत्याच पक्षाचा कोणताच उमेदवार अद्याप निश्चित नसल्याने प्रत्येक जण एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यातच धन्यता मानत आहेत

अशोक कांबळे

मोहोळ : राज्यासह जिल्ह्यात येऊ घातलेल्या २०१९ च्या विधानसभेचे वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक बड्या-बड्या मंडळींनी सेना-भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. अशा परिस्थितीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात मात्र आजही शांतताच दिसून येत आहे.

जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात ज्या-त्या पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व राजकीय मंडळी कामाला लागली आहेत. मात्र राखीव असणाºया मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, भाजप व वंचितसह सर्वच पक्षातून स्थानिक उमेदवारांसह बाहेरून येणाºयांची  संख्या जरी ढीगभर असली तरी कोणत्याच पक्षाचा कोणताच उमेदवार अद्याप निश्चित नसल्याने प्रत्येक जण एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यातच धन्यता मानत आहेत. परंतु गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या मतदारसंघाला आता तरी चांगला स्थानिक आमदार मिळणार का? का पुन्हा ठरल्याप्रमाणे बाहेरचाच उमेदवार येणार? अशी चर्चा गावागावात कट्ट्यावर बसणाºया ज्येष्ठ नागरिकांसह युवा मतदारातून रंगत दिसत आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार रमेश कदम यांना ६२ हजार १२० मते मिळाली होती. भाजपचे संजय क्षीरसागर यांना ५३ हजार ७५३ मते मिळाली होती. शिवसेनेचे मनोज शेजवाल यांना ४२ हजार ४७८ मते मिळाली आणि माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना १२०१४ मते मिळाली होती. यात ८ हजार ३६७ मतांनी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम विजयी झाले होते.परंतु विद्यमान आमदार रमेश कदम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या प्रकरणांमध्ये गेली चार वर्षे कारागृहात आहेत. याची उणीव राष्ट्रवादीला चांगलीच जाणवली आहे. अशा कठीण परिस्थितीत मागील दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या गटाने राष्ट्रवादीशी फारकत घेतली. विजयराज डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात भीमा परिवाराचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहोळ तालुका पंचायत समिती राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आहे, हे मान्यच करावे लागणार आहे. 

दुसरीकडे सेना-भाजपची अवस्था यापेक्षाही वेगळी आहे. तालुक्यात शिवसेना व भाजपमधील गटबाजी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ती कमी होण्याऐवजी वाढतच गेली आहे. या गटबाजीचाच फायदा राष्ट्रवादीला प्रत्येक वेळी होत आला आहे. या सर्व गोष्टींची जाणीव असताना देखील सेना-भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अद्याप तरी ही गटबाजी संपविण्यात यश आलेले दिसत नाही. या येणाºया विधानसभेत तरी ही गटबाजी थांबणार का? असा प्रश्न शिवसैनिकांसह भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

 राष्ट्रवादीच्या माध्यमातून आजमितीला भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते राजन पाटलांपर्यंत संपर्कात आहेत. त्याचबरोबर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक निर्मला बावीकर, पुण्याचे नगरसेवक सुभाष जगताप, कॉन्टॅÑक्टर राजाभाऊ खरे, निवृत्त सनदी अधिकारी सुनील रावडे यांनी वरच्या पातळीवरून प्रयत्न चालवले आहेत. तर पूर्वीपासून सेनेच्या वाट्याला असणाºया मतदारसंघातील जागेसाठी भाजपमधून सेनेत गेलेले नागनाथ क्षीरसागर, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेजवाल, सेनेचे तालुका उपप्रमुख नागेश व्हनकळसे, अनगरचे उद्योजक अर्जुनराव वाघमारे यांनी उमेदवारी मागितली आहे. तर भाजपमधून गत पंचवार्षिकला केवळ ८ हजार मतांनी पराभूत झालेले संजय क्षीरसागर, राज्यसभेचे खासदार अमर साबळे तर काँग्रेस आयच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागासवर्गीय युवक सेलचे गौरव खरातही तयारीत आहेत. वंचित आघाडीमधून अ‍ॅड़ विनोद कांबळे, धनंजय आवारे प्रयत्नात आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोलvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण