शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

मोबाईल टॉवर झाले आता पक्ष्यांच्या सवयीचे; परदेशी बोरड्यासह सर्वच स्थिरावतात आरामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:53 PM

मोबाईलच्या रेडिएशनची आता भीती नाही उरली;  सोलापूर शहरातील मोबाईल टॉवरवर चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांनी थाटली घरटी.

ठळक मुद्देसोलापूरच्या कन्ना चौकातील मोबाईल टॉवरवर शेकडो पक्षी बसल्याचे सकारात्मक चित्रचिमण्यांसह सर्वच पक्ष्यांच्या वस्तुस्थितीवर ‘लोकमत’ने नुकताच धांडोळा घेत काढलेला हा निष्कर्षसन २००७ -२०१५ दरम्यानच्या कालावधीत मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा परिणाम म्हणून पक्ष्यांची संख्या घटत गेली

यशवंत सादूल

सोलापूर : मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम होऊन मागील काही वर्षे चिमण्यांची संख्या घटली होती़ त्यासोबत वाढत्या काँक्रिटीकरणामुळे त्यांची वस्तीस्थाने नष्ट झाली होती़ पण अलीकडे चिमण्यांसोबत मानवी वस्तीशी सलगी करून राहणाºया सर्वच पक्ष्यांच्या प्रजातींनी मोबाईल टॉवरच्या रेडिएशनची सवय करून घेतल्याने त्यांच्या संख्येत भर पडली आहे. काही पक्ष्यांनी टॉवरवरच घरटी बांधली आहेत. सोलापूरच्या कन्ना चौकातील मोबाईल टॉवरवर शेकडो पक्षी बसल्याचे सकारात्मक चित्र नुकतेच दिसून आले. चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांच्या वस्तुस्थितीवर ‘लोकमत’ने नुकताच धांडोळा घेत काढलेला हा निष्कर्ष आहे.

सन २००७ -२०१५ दरम्यानच्या कालावधीत मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा परिणाम म्हणून पक्ष्यांची संख्या घटत गेली, अशी सर्वसामान्य समजूत होती़ अनेक पक्षीमित्रांनीही असे मत मांडले होते़ पण ही समजूत चुकीची ठरली आहे.

आता मोबाईल टॉवरवरच पक्षी बसत आहेत. अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय असलेला मोबाईल टॉवर व त्यामुळे रोडावणारी पक्ष्यांची संख्या. पण ती संख्या कमी होण्यामागे अनेक कारणांपैकी एक कारण आहे.

अलीकडे अनेक पक्ष्यांनी टॉवरवर घरटे बांधल्याचे दिसून येते. सोलापुरातील अनेक ठिकाणी बोरड्या या स्थलांतरित पक्ष्यांचे थवे चक्क टॉवरवर बसलेले दिसून येतात. डिसेंबर ते एप्रिल या चार-पाच महिन्यांकरिता हे पक्षी टॉवर रेडिएशनच्या संपर्कात येतात, त्यामुळे त्याची तीव्रता कमी भासते, स्थानिक पक्ष्यांनीही रेडिएशनची सवय करून घेतल्याने त्यांची संख्या वाढत आहे. टॉवर उंच असल्याने पक्ष्यांना बसणे सोपे होते म्हणून त्यावर बसतात- सिद्राम पुराणिक, पक्षीमित्र 

मोबाईल टॉवरच्या रेडिएशनचा पक्ष्यांवर परिणाम होतो, असा काढलेला निष्कर्ष अर्धवट अभ्यासावर आधारित होता. सध्या तरी टॉवरचा कोणताच परिणाम पक्ष्यांवर होत नाही, असे दिसून येते. मागील काही वर्षांत चिमण्या कमी झाल्या ते त्यांच्या वस्ती नष्ट झाल्यामुळे. पण सध्या बांधण्यात येणाºया उड्डाण पुलामुळे सर्वच पक्ष्यांना राहण्याची सोय होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष्यांची संख्या वाढत आहे़ - भरत छेडावन्यजीव मित्र 

कबुतर, बुलबुल, रॉबिन, सूर्यपक्षी, साळुंकी, कावळा, चिमणी अशा मानवी वस्तीशी सलगी करून राहणाºया पक्ष्यांवर सुरुवातीला रेडिएशनचा परिणाम झाला, असे म्हणतात़ पण त्याला ठोस पुरावा नाही. मोबाईल कंपन्यांनी टॉवरची संख्या वाढविल्याने रेडिएशनची विभागणी केली़ त्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली असावी. पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची, राहण्याची सोय होऊ लागल्याने पक्ष्यांची वाढ होऊ लागली़ त्यांना असलेल्या रेडिएशनची सवय झाली आह़े-नागेश राव,पक्षीमित्र 

टॅग्स :SolapurसोलापूरMobileमोबाइलMobiKwikमोबिक्विक