शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आदर्श ग्राम योजनेला ठेंगा

By admin | Updated: July 17, 2015 16:53 IST

केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.

आमदारांची उदासीनता: निवडायच्या आहेत तीन ग्रामपंचायती
शिवाजी सुरवसे■ सोलापूर
केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.
प्रत्येक आमदाराने तीन ग्रामपंचायती २0१९ पर्यंत आदर्श करावयाच्या आहेत. याबाबत २0 मे रोजी शासन निर्णय निघाला. दोन महिने झाले तरीही एकाही आमदार महोदयांनी ग्रामपंचायती निवडल्या नाहीत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नावे देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे ११ आणि विधानपरिषदेचे तीन आमदार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी खासदारांसाठी आदर्श संसद ग्राम योजना सुरू केली. जिल्ह्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील तुळशी हे गाव तर खासदार शरद बनसोडे यांनी पंढरपूर तालुक्यातील येवती ही गावे निवडली आहेत. एक वर्ष झाले. या गावांना आदर्श करण्यासाठी वारंवार बैठका झाल्या, त्यानुसार काही कामेही सुरू झाली आहेत. आता राज्य शासनाच्या २0 मे २0१५ रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून आमदार आदर्श ग्राम योजनेचा आदेश काढण्यात आला आहे. सर्व आमदारांना हा आदेश देखील पाठविण्यात आला आहे. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून २0१९ पर्यंत विकसित करावयाची आहेत. निवडलेल्या गावांमध्ये आमदार निधीबरोबच शासनाकडून देखील विकासकामांसाठी वेगळा निधी मिळणार आहे. या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची संयुक्त अंमलबजावणी या गावात केली जाणार आहे. गावे निवडावयाचे निकष
■ आमदारांनी स्वत:चे किंवा त्यांच्या पती/पत्नीचे गाव निवडू नये
■ त्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असावी
■ मतदारसंघ पूर्णपणे शहरी भागात असेल तर आमदारांनी जिल्ह्यातील कोणतीही एक ग्रामपंचायत निवडावी 
■ मतदारसंघ शहरी व ग्रामीण भागात विभागला असल्यास मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करावी 
■ विधानपरिषद सदस्य कोणत्याही जिल्ह्यातून ग्रामपंचायतीची निवड करु शकतील.