शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

आमदार आदर्श ग्राम योजनेला ठेंगा

By admin | Updated: July 17, 2015 16:53 IST

केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.

आमदारांची उदासीनता: निवडायच्या आहेत तीन ग्रामपंचायती
शिवाजी सुरवसे■ सोलापूर
केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.
प्रत्येक आमदाराने तीन ग्रामपंचायती २0१९ पर्यंत आदर्श करावयाच्या आहेत. याबाबत २0 मे रोजी शासन निर्णय निघाला. दोन महिने झाले तरीही एकाही आमदार महोदयांनी ग्रामपंचायती निवडल्या नाहीत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नावे देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे ११ आणि विधानपरिषदेचे तीन आमदार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी खासदारांसाठी आदर्श संसद ग्राम योजना सुरू केली. जिल्ह्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील तुळशी हे गाव तर खासदार शरद बनसोडे यांनी पंढरपूर तालुक्यातील येवती ही गावे निवडली आहेत. एक वर्ष झाले. या गावांना आदर्श करण्यासाठी वारंवार बैठका झाल्या, त्यानुसार काही कामेही सुरू झाली आहेत. आता राज्य शासनाच्या २0 मे २0१५ रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून आमदार आदर्श ग्राम योजनेचा आदेश काढण्यात आला आहे. सर्व आमदारांना हा आदेश देखील पाठविण्यात आला आहे. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून २0१९ पर्यंत विकसित करावयाची आहेत. निवडलेल्या गावांमध्ये आमदार निधीबरोबच शासनाकडून देखील विकासकामांसाठी वेगळा निधी मिळणार आहे. या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची संयुक्त अंमलबजावणी या गावात केली जाणार आहे. गावे निवडावयाचे निकष
■ आमदारांनी स्वत:चे किंवा त्यांच्या पती/पत्नीचे गाव निवडू नये
■ त्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असावी
■ मतदारसंघ पूर्णपणे शहरी भागात असेल तर आमदारांनी जिल्ह्यातील कोणतीही एक ग्रामपंचायत निवडावी 
■ मतदारसंघ शहरी व ग्रामीण भागात विभागला असल्यास मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करावी 
■ विधानपरिषद सदस्य कोणत्याही जिल्ह्यातून ग्रामपंचायतीची निवड करु शकतील.