शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

आमदार आदर्श ग्राम योजनेला ठेंगा

By admin | Updated: July 17, 2015 16:53 IST

केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.

आमदारांची उदासीनता: निवडायच्या आहेत तीन ग्रामपंचायती
शिवाजी सुरवसे■ सोलापूर
केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आदर्श आमदार ग्राम योजना राबविण्याचा 'फडणवीस सरकार'ने निर्णय घेतला असला तरी सोलापूर जिल्ह्यातील १४ आमदारांनी याला ठेंगा दाखविला आहे.
प्रत्येक आमदाराने तीन ग्रामपंचायती २0१९ पर्यंत आदर्श करावयाच्या आहेत. याबाबत २0 मे रोजी शासन निर्णय निघाला. दोन महिने झाले तरीही एकाही आमदार महोदयांनी ग्रामपंचायती निवडल्या नाहीत. त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे नावे देणे अपेक्षित आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे ११ आणि विधानपरिषदेचे तीन आमदार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी खासदारांसाठी आदर्श संसद ग्राम योजना सुरू केली. जिल्ह्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा तालुक्यातील तुळशी हे गाव तर खासदार शरद बनसोडे यांनी पंढरपूर तालुक्यातील येवती ही गावे निवडली आहेत. एक वर्ष झाले. या गावांना आदर्श करण्यासाठी वारंवार बैठका झाल्या, त्यानुसार काही कामेही सुरू झाली आहेत. आता राज्य शासनाच्या २0 मे २0१५ रोजी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडून आमदार आदर्श ग्राम योजनेचा आदेश काढण्यात आला आहे. सर्व आमदारांना हा आदेश देखील पाठविण्यात आला आहे. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील तीन ग्रामपंचायती आदर्श ग्राम म्हणून २0१९ पर्यंत विकसित करावयाची आहेत. निवडलेल्या गावांमध्ये आमदार निधीबरोबच शासनाकडून देखील विकासकामांसाठी वेगळा निधी मिळणार आहे. या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अस्तित्वात असलेल्या विविध योजनांची संयुक्त अंमलबजावणी या गावात केली जाणार आहे. गावे निवडावयाचे निकष
■ आमदारांनी स्वत:चे किंवा त्यांच्या पती/पत्नीचे गाव निवडू नये
■ त्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असावी
■ मतदारसंघ पूर्णपणे शहरी भागात असेल तर आमदारांनी जिल्ह्यातील कोणतीही एक ग्रामपंचायत निवडावी 
■ मतदारसंघ शहरी व ग्रामीण भागात विभागला असल्यास मतदारसंघाच्या ग्रामीण भागातून ग्रामपंचायतींची निवड करावी 
■ विधानपरिषद सदस्य कोणत्याही जिल्ह्यातून ग्रामपंचायतीची निवड करु शकतील.