शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

"मला अडवायला रोज काळ्या बाहुल्या रोवतंय"; जयकुमार गोरेंनी सुनावलं, म्हणाले, "देवाभाऊ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:51 IST

मंत्री जयकुमार गोरे यांनी टोलेबाजी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Jaykumar Gore: एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना कडाडून इशारा दिला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. त्यानंतर सोलापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी टोलेबाजी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही, असं जयकुमार गोरे म्हणाले.

शनिवारी रात्री माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. नुकतीच जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत तुफान फटकेबाजी केली. देवाभाऊ माझ्या पाठीशी असल्याचेही जयकुमार गोरे म्हणाले.

"अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालतंय, काळ्या बाहुल्या रोवतंय. एक साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झालं. एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्यावर केस झाली नाही. आम्हाला सवय आहे. माझ्या मतदारसंघातली लोक केसकडे बघत पण नाही. पण निवडणूक आली आणि जयकुमार गोरेवर केस दाखल झाली नाही असं कधीच झालं नाही. पण मी कधी थांबलो नाही. कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहेत तोपर्यंत जयकुमार गोरेचं कोणीही काही वाकड करू शकणार नाही," असं जयकुमार गोरे म्हणाले.

"कुणाचंही वाईट करून कधीच कोणाचे चांगलं होत नाही. जो वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही. तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधीही हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय थोडीशी वाट बघा. आज काही जास्तीच बोलणार नाही. माझ्याकडे सगळेच आहे. जे काही करायचं आहे ते सगळं माझ्याच खात्याकडे आहे," असंही जयकुमार गोरे म्हणाले.

"राज्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा असणारा माण-खटाव पट्ट्यात हा पठ्ठ्या जन्माला आला आहे. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे. माण-खटाव तालुका आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या ३२ दिवसांत शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येईल हे लक्षात ठेवा," अस जयकुमार गोरेंनी म्हटलं. 

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा