शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

"मला अडवायला रोज काळ्या बाहुल्या रोवतंय"; जयकुमार गोरेंनी सुनावलं, म्हणाले, "देवाभाऊ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:51 IST

मंत्री जयकुमार गोरे यांनी टोलेबाजी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Jaykumar Gore: एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना कडाडून इशारा दिला आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली. त्यानंतर सोलापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना जयकुमार गोरे यांनी टोलेबाजी करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही, असं जयकुमार गोरे म्हणाले.

शनिवारी रात्री माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जयकुमार गोरे बोलत होते. नुकतीच जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत तुफान फटकेबाजी केली. देवाभाऊ माझ्या पाठीशी असल्याचेही जयकुमार गोरे म्हणाले.

"अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज सकाळ संध्याकाळी नदीच्या बाजूला जाऊन पूजा घालतंय, काळ्या बाहुल्या रोवतंय. एक साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झालं. एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्यावर केस झाली नाही. आम्हाला सवय आहे. माझ्या मतदारसंघातली लोक केसकडे बघत पण नाही. पण निवडणूक आली आणि जयकुमार गोरेवर केस दाखल झाली नाही असं कधीच झालं नाही. पण मी कधी थांबलो नाही. कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता माऊली आहेत तोपर्यंत जयकुमार गोरेचं कोणीही काही वाकड करू शकणार नाही," असं जयकुमार गोरे म्हणाले.

"कुणाचंही वाईट करून कधीच कोणाचे चांगलं होत नाही. जो वाईट करतो त्याचं कधीच चांगलं होत नाही. तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधीही हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय थोडीशी वाट बघा. आज काही जास्तीच बोलणार नाही. माझ्याकडे सगळेच आहे. जे काही करायचं आहे ते सगळं माझ्याच खात्याकडे आहे," असंही जयकुमार गोरे म्हणाले.

"राज्यातील सर्वात दुष्काळी जिल्हा असणारा माण-खटाव पट्ट्यात हा पठ्ठ्या जन्माला आला आहे. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे. माण-खटाव तालुका आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या ३२ दिवसांत शेतीचं पाणी तुमच्या बांधावर येईल हे लक्षात ठेवा," अस जयकुमार गोरेंनी म्हटलं. 

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा