शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

चंद्रभागा नदीची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न : मेधा पाटकर

By रवींद्र देशमुख | Updated: May 10, 2024 07:41 IST

पंढरपुरात समता वारी सोहळा

रविंद्र देशमुख 

सोलापूर  : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या संतभूमीत चंद्रभागेची दयनीय अवस्था पाहून मन सुन्न झाल्याची भावना नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. त्या समता वारी सोहळा निमित्त पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत साने गुरुजी स्मारकाचे प्रमुख संजय गोपाळ प्रा. डॉक्टर राजेंद्र कुंभार जयसिंगपूर, राजन इंदुलकर, प्रा. रामचंद्र वाघ, भार्गव पवार उपस्थित होते.

यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, संतांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी संत विचार पिठाची गरज आहे. नव्या पिढीला ती प्रेरणा देणारी आहे. साने गुरुजींचे केवळ विचार व कार्य मनाला भावणारे आहे. संतांचे संघर्ष महत्त्वाचे असून त्यांचे विचार जिवंत आहेत.  संविधानाचे अधिकार पूर्ण करण्यासाठी विचारांची गरज सध्याच्या पिढीला आहे. या सद्य परिस्थितीत सरकारवर विश्वास ठेवू नये त्यांचे पक्षीय राजकारण वेगळं आहे. समाज राजकारण वेगळे आहे. समाजवादाची भूमिका त्यावेळी साने गुरुजींनी ठेवली होती. त्यांचे विचार व त्यांना मानणारे आजही आहेत.

आजही जाती-धर्माच्या नावाने विभाजन होत असून अजूनही जातीवाद मिटला नाही.  जाती निर्मूलन हवे आहे परंतु असंवेदनशील सरकार संवाद साधायला तयार नाही याचे दुर्दैव वाटते. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना हमीभाव देऊ असे आश्वासन या सरकारने दिले होते. परंतु स्वामीनाथन आयोगाच्या आधारावर शेतक-यांना दर मिळाला पाहिजे. त्यांनी तेच हटवले आहे. शेतकऱ्यांचे स्थान व सन्मान वाढला पाहिजे.

टॅग्स :Solapurसोलापूर