शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

लाखो लिटर पाणी अक्कलकोटमध्ये वाया

By admin | Updated: June 30, 2014 13:55 IST

अक्कलकोट नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. नळांना तोटी नसल्याने सकाळी सोडण्यात आलेले पाणी दुपारपर्यंत सुरूच असते.

पाण्याचा योग्य वापर करा !

शंकर हिरतोट ■ अक्कलकोट
अक्कलकोट नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. नळांना तोटी नसल्याने सकाळी सोडण्यात आलेले पाणी दुपारपर्यंत सुरूच असते. हे पाणी मोठय़ा प्रमाणात गटारीत जाते. शिवाय काही वाहनचालक चारचाकी व दुचाकी धुण्यासाठी या पाण्याचा वापर करताना दिसतात. एकेकाळी पाणीटंचाई असणार्‍या अक्कलकोटमध्ये सध्या पाण्याचा सुकाळच आहे असेच म्हणावे लागेल.
सध्या वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आगामी काळात पावसाअभावी होणार्‍या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. अन्यथा पुन्हा पाणी टंचाईला शहरवासीयांना सामोरे जावे लागणार हे नक्की ! यासाठी नगरपालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांनी दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 
सध्या शहरात एकूण ४ हजार ८00 नळ कनेक्शन आहेत. संपूर्ण शहराला रोज ५२ लाख लिटर पाण्याची गरज आहे. अशा स्थितीत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या हिळ्ळी, सांगवी, हालचिंचोळी या तीनही योजना सध्या पाण्याअभावी बंद आहेत. नुकतेच कार्यान्वित झालेल्या कुरनूर-अक्कलकोट या सुजल-निर्मल योजनेवर शहराचा पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु ५ ते ६ तास भारनियमन होत असल्याने उर्वरित वेळेत ताशी दोन ते अडीच लाख लिटर पाण्याचा उपसा होतो. या उपलब्ध होणार्‍या पाण्याचे वितरण शहरातील नळधारकांना पाच दिवसांतून एकदा असे तीन टप्प्यात होते.
काही भागात तीन दिवसाआड तर काही भागाला पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. तीन दिवसांनंतर जास्त दाबाने दोनच तास पाणी सोडल्यास शहरवासीयांना मुबलक पाणी मिळेल व ते वाया जाणार नाही. सध्या काही भागात ४ ते ५ तास तर काही भागात ७ ते ८ तास पाणीपुरवठा केल्याने पाणी वाया जाते आहे.
----------
पॅरा पाईपलाईन नसल्याने सोडलेले पाणी वाया जाते. नगरपरिषदेतर्फे नळांना तोटी बसविण्यात येणार आहे. त्यानंतर या तोटीकडे नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे. - अभिजित ताम्हाणे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख
 
■ तत्कालीन नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा यांच्या कार्यकाळात तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पाणीटंचाईवर कायमस्वरुपी तोडगा म्हणून सुजल-निर्मल योजनेतून कुरनूर-अक्कलकोट अशी नवीन पाईपलाईन मंजूर केली होती. परंतु पालिकेतील भाजप-राष्ट्रवादी या सत्ताधार्‍यांनी याला विरोध केल्याने ही योजना रेंगाळली. विद्यमान नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांनी पाठपुरावा करून ही योजना कार्यान्वित केली.