शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Shiv Jayanti 2020; वृक्ष लागवडीबरोबर ‘पाणी बचाव’चा संदेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:52 IST

युवकांना स्त्री रक्षणाची शिवशपथही देणार; जय महाराष्ट्र तरुण मंडळ करणार शिवछत्रपतींना अनोखे अभिवादन

ठळक मुद्देकेवळ शिवछत्रपतींच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवजयंती साजरी करणे उचित होणार नाहीछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणविषयक विचार यंदाच्या शिवजयंती सोहळ्यातून आचरणात आणण्यात येणार

सोलापूर : जो व्हीआयपी रस्ता म्हणून ओळखला जातो त्या होटगी रस्त्यावरील मजरेवाडी ते विमानतळापर्यंतच्या दुभाजकाला पुन्हा आकर्षक झाडांचे वैभव मिळवून देण्यासाठी जय महाराष्ट्र तरुण मंडळ सरसावले आहे. दुभाजकात रोपे लावण्याबरोबर ‘पाणी बचाव’ यासह विविध संदेश असणारे फलक लावून खºया अर्थाने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक तथा युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख बालाजी चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

केवळ शिवछत्रपतींच्या प्रतिमेची अथवा मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवजयंती साजरी करणे उचित होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचेपर्यावरणविषयक विचार यंदाच्या शिवजयंती सोहळ्यातून आचरणात आणण्यात येणार असल्याचे बालाजी चौगुले यांनी नमूद केले. शिवछत्रपतींच्या जलनीतीचा अभ्यास केला तर साºयांनीच पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. छत्रपती शिवरायांची ही जलनीती विचारात घेऊन यंदा मजरेवाडी, भारतमाता हौसिंग सोसायटी, जय बजरंग नगरात वृक्षारोपण हाती घेण्यात येणार आहे.शिवाय व्हीआयपी रोडवरील मजरेवाडी ते विमानतळापर्यंतच्या मार्गावरील दुभाजकातील झाडे वाळून गेली आहेत. 

या दुभाजकात पुन्हा नव्याने झाडे लावून हा मार्ग पुन्हा हिरवाईने नटवण्यासाठी जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरसावले आहेत. हे समाजोपयोगी कार्य करून खºया अर्थाने शिवछत्रपतींना अनोखे अभिवादन करण्याची परंपरा यापुढेही चालू राहणार असल्याचे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन कोकाटे यांनी सांगितले. 

शिवजयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन कोकाटे, देवेंद्र जोडमोटे, राहुल देशपांडे, पृथ्वीराज चौगुले, श्रीकांत चौगुले, दत्तात्रय शिंदे, अप्पू बिराजदार, काशिनाथ चाबुकस्वार, दादासाहेब रसाळे, नामदेव पवार, विजय सरडे, अतुल चव्हाण, अंकुश जगदाळे, कृष्णा देशपांडे, गौरव अथणे आदी प्रयत्नशील आहेत. 

शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर- चौगुले- अठरा पगड जातींना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. शिवछत्रपतींच्या या स्वराज्यात सर्व जाती-धर्मांना समान न्याय होता. शिवछत्रपतींनी अनेक धोरणे राबवली. त्यातील जलनीती, पर्यावरण हे विषय जय महाराष्ट्र तरुण मंडळाने घेतले असून, होटगी रोडवरील काही अंतरावरील दुभाजकात झाडे लावण्याबरोबर त्या ठिकाणी पाणी बचतीचे महत्त्व सांगणारे संदेश लावण्यात येणार असल्याचे मंडळाचे संस्थापक बालाजी चौगुले यांनी सांगितले. अनेक कार्यक्रम राबवून शिवरायांच्या विचारांची प्रचिती यंदाच्या शिवजयंती उत्सवात शिवप्रेमींना पाहावयास मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जय महाराष्ट्र तरुण मंडळाने यंदा शिवजयंतीनिमित्त स्त्री रक्षणासाठी परिसरातील युवकांना शिवशपथ देण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. संस्थापक बालाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीचा हा सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ असा होईल. -सचिन कोकाटे.

आजच्या युवकांना शिवछत्रपती समजावेत, यासाठी मंडळाच्या वतीने शिवजागर करण्यात येणार आहे. शिवछत्रपतींचे विचार आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम निश्चित करण्यात येणार आहे. -नामदेव पवार

होटगी रोडवरील मजरेवाडी भागात गेल्या ११ वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदा जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. होटगी रोडवरील दुभाजकात झाडे लावून व्हीआयपी रस्ता फुलवण्यात येणार आहे. शिवप्रेमींनी सहभागी व्हावे.-दत्तात्रय शिंदे.

माझ्यासारख्या लिंगायत समाजाला मंडळात स्थान देऊन मंडळाने छत्रपतींचा समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपतींचे विचार घराघरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते कटिबद्ध आहेत.-अप्पू बिराजदार

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजenvironmentपर्यावरण