शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

साने गुरूजी जयंती विशेष; पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठात होणार साने गुरुजींचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 10:52 IST

अन् मागासवर्गीयांना खुले झाले मंदिर; तत्कालीन सभापती मावळणकरांनी केली होती मध्यस्थी

ठळक मुद्देसाने गुरूजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मागासवर्गीयांना मिळावा यासाठी उपोषण करीत असताना राज्यभर जनजागृती केलीसहा दिवस उपोेषण झाल्यानंतर प्र.के. अत्रे यांनी उपोषणस्थळी त्यांची भेट घेतली होतीसनातनी मंडळींकडून याला विरोध झाला होता. मात्र, हा विरोध झुगारत हे आंदोलन यशस्वी झाले

सतीश बागल

पंढरपूर :  साने गुरूजी यांनी श्री विठ्ठल मंदिरात मागासवर्गीयांना प्रवेशासाठी दि. १ ते १० मे १९४६ साली सलग १० दिवस उपोषण केले. हे उपोषण म्हणजे परिवर्तनाची सुरूवात होती. या सानेगुरुजींचे ज्या ठिकाणी त्यांनी उपोषण केले तेथे आता स्मारक होणार आहे. साने गुरुजींच्या उपोषणासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेचीदेखील मदत झाली. लोकसभेचे तत्कालीन सभापती मावळणकर यांनी पंढरीत येऊन यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतरच्या काळात सर्व जातींतील मंडळींना मंदिरातील प्रवेश खुला झाला. साने गुरूजींची जयंती साजरी होत असताना समानतेसाठी त्यांनी केलेले काम राज्यातील जनतेसाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे. 

साने गुरूजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मागासवर्गीयांना मिळावा यासाठी उपोषण करीत असताना राज्यभर जनजागृती केली होती. येथील स्टेशन रोडवरील संत तनपुरे महाराज मठात हे उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या उपोषणाला जनमानसातून चांगला पाठिंबा मिळाला. सहा दिवस उपोेषण झाल्यानंतर प्र.के. अत्रे यांनी उपोषणस्थळी त्यांची भेट घेतली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने उपोषणाला पाठिंबा देत साने गुरूजींचे काही कमीजास्त झाल्यास त्याला सरकार जबाबदार असे सांगत सर्व बाजूंनी दबाव वाढविला होता. त्यानंतर त्यावेळी मंदिरात असणारे उत्पात तसेच बडवे यांनी मागासवर्गीय समाजास मंदिर प्रवेशास होकार दिला. त्यावेळी तत्कालीन आ. तात्यासाहेब डिंगरे तसेच इतर समाजसुधारक उपस्थित होते. श्री विठ्ठल मंदिरातील प्रवेशानंतर गावागावातील पाणवठ्यावर मागासवर्गीयांना पाणी भरता येईल, सर्वत्र समानता येईल, अशी साने गुरूजी यांची भावना होती.

सनातनी मंडळींकडून याला विरोध झाला होता. मात्र, हा विरोध झुगारत हे आंदोलन यशस्वी झाले. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली होती. साने गुरूजींविषयीची माहिती देताना नंदकुमार कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात साने गुरूजी यांनी तुरूंगवास भोगला. अंमळनेर येथे काही दिवस नोकरी केली. सुसंस्कारित पिढी घडावी यासाठी शामची आई या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. आईचं अंतकरण असणाºया साने गुरूजी यांनी समाजात समानता यावी, सर्वधर्मसमभाव निर्माण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. 

संत तनपुरे मठ क्रांतिकारी घटनांचा साक्षीदार- साने गुरूजी यांनी मागासवर्गीयांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी संत तनपुरे महाराज मठातील चारोधाम मंडपात दहा दिवस उपोषण केले. ज्या ठिकाणी उपोषण केले, त्याठिकाणी साने गुरूजी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील बालविकास मंडळ तसेच इतर संस्थांकडून प्रस्ताव आला असल्याचे ह.भ.प. बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी सांगितले. संत तनपुरे महाराज मठ अनेक क्रांतिकारी घटनांचा साक्षीदार आहे. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना याच ठिकाणी झाली. तत्कालीन राष्टÑपती राजेंद्र प्रसाद तसेच प्रतिभाताई पाटील यांनी याठिकाणी भेट दिली आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना याठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरSane Gurujiसाने गुरुजी