शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील शासकीय रुग्णालयाला औषधांची चणचण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 11:40 IST

बिलापोटी ५.५ कोटी थकले; पुरवठादार करताहेत टाळाटाळ

ठळक मुद्दे दररोज दीड हजार रुग्णांची तपासणी आणि औषधोपचाराचा ताणगतवर्षीच्या औषध बिलापोटी ५.५ कोटी थकलेपुरवठाधारकांकडून औषधे पुरवण्यास टाळाटाळ

विलास जळकोटकर

सोलापूर : पावसाळा आणि संसर्गजन्य आजार यांचे अतूट नाते मानले जाते. त्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहावे लागते. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या चौकशीतून दररोज दीड हजार रुग्णांची तपासणी आणि औषधोपचाराचा ताण असणाºया सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) औषधांची चणचण जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षीच्या औषध बिलापोटी ५.५ कोटी थकले असल्यामुळे पुरवठाधारकांकडून औषधे पुरवण्यास टाळाटाळ होत आहे. 

 सिव्हिलमध्ये नजीकच्या मराठवाडा, कर्नाटकातील रुग्णही बाह्य आणि आंतररुग्ण विभागात उपचारासाठी येतात. ही संख्या जून ते सप्टेंबर या पावसाळ्यात अधिक असते. या काळात डेंग्यू, चिकनगुनिया, विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेकडून पुरेसा औषधसाठा असणे आवश्यक आहे. मात्र जवळपास ९० टक्के रुग्णांचा भार असणाºया शासकीय रुग्णालयात औषधांची चणचण भासू लागली आहे. यासंबंधी शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाकडूनही दुजोरा देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचा ओढाही सिव्हिलकडे असल्यामुळे शासकीय स्तरावरुन मिळणारे साडेचार ते पाच कोटी अनुदान अपुरे पडत आहे. परिणामी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. 

आवश्यकतेनुसार औषध खरेदीचे अधिकार पूर्वी स्थानिकपातळीवर असायचे, मात्र अलीकडे औषध खरेदी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हापकिन इन्स्टिट्यूटमार्फत ही औषधे पुरवली जातात. शासकीय रुग्णालयाकडे मिळणाºया अनुदानातून हे बिल त्यांना अदा करण्यात येते. औषधांच्या वाढत्या किमतीच्या तुलनेत मिळणारे अनुदान कमी असल्यामुळे आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही औषध टंंचाई जाणवत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. या तांत्रिक बाबी असल्यातरी सर्वसामान्य रुग्णांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. 

उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात आषाढी वारीपासून संसर्गजन्य आजारांचे   औषधांचा साठा मुबलक असल्याचे स्पष्ट करताना जिल्हा शल्यचिकित्सक सुमेध अंदूरकर यांनी यातील साठा केरळ पूरग्रस्त रुग्णांसाठी मदत म्हणून देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

निधीची तरतूद वाढवा- रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून ही गरज भागवून औषधे व तत्सम साहित्य पुरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. याशिवाय शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम फार पूर्वी निर्धारित केलेली आहे. रुग्णांची संख्या विचारात घेता या निधीतून पुरेसा साठा मिळण्यास अडचण भासते़ यासाठी निधी वाढवून मिळण्याची मागणीही प्रशासनाकडून होऊ लागली आहे.

बाहेरुन आणावी लागतात औषधे- शासकीय रुग्णालयात उपचार घेणाºया रुग्णांना पुरेसे औषध नसल्यामुळे बाहेरुन मागवण्याची वेळ येत असल्याचे प्रत्ययास येत आहे. या संदर्भात बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिला.  प्रशासनाशी चर्चा करता साठा नसल्यास रुग्णाच्या हिताच्या दृष्टीने ते मागवण्याची आवश्यकता असते म्हणून वेळ येत असल्याचे सांगण्यात आले. शासनस्तरावरुन अत्यावश्यक बाब म्हणून कार्यवाही व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलmedicineऔषधंGovernmentसरकार