सोलापूर - आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरीस निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे आज सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे आगमन झाले. माऊलींसह लाखो वैष्णवांचे जिल्हा वासियांच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामानंतर सोहळा सकाळी ६़३० वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. पहाटे माऊलींची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.
विठुनामाच्या जयघोषात माऊलीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 12:35 IST