शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

बार्शीत पार पडला चक्क स्मशनभूमीत विवाह सोहळा

By admin | Published: May 29, 2017 3:02 PM

.

शहाजी फुरडे-पाटील बार्शी : मनुष्याच्या जीवनात जन्मल्यापासून ते मरेपर्यंत अनेक प्रकारचे संस्कार केले जातात़त्यामध्ये लग्नसंस्कार हा देखील आयुष्याच्या टप्प्यावरील महत्वाचा संस्कार आहे़ आजवर वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालेली आपण पाहिली असतील मात्र भगवंताचे अधिष्ठान असलेल्या बार्शी शहरात चक्क स्मशानभूमीमध्ये (मोक्षधाम ) प्रतिष्ठीत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसन्नदाता गणेश मंदीर ट्रस्टच्या सहकार्याने अनोखा विवाह सोहळा पार पडला़ बार्शी शहरात धसपिंपळगाव रोडवर बार्शी नगरपालिकेची स्मशानभूमी आहे़ मागील दहा ते पंधरा वर्षापुर्वी या भागात लहान मुले किंवा नागरिक देखील जायला भित असत,मात्र मागील सहा वर्षापुर्वी बार्शीतील प्रसन्नदाता गणेश मंदीर ट्रस्टच्या वतीने ही स्मशानभूमी विकसीत करण्यासाठी घेतली़ त्यानंतर या स्मशानभूमीचे रुपच पालटले गेले आहे़ सुमारे एक हजाराच्या जवळपास लावलेली हिरवी झाडे, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी भव्य असे स्टेडियम, सहा दहनशेड, लाईट व्यस्था, न्हावी कट्टा, आ़ दिलीप सोपल यांच्या निधीतून अंतर्गत डांबरी रस्ते, संरक्षक भिंत, लॉन आदी सुविधा अध्यक्ष कमलेश मेहता यांनी केलेल्या आहेत़ बार्शीच नव्हे तर कोणत्याही स्मशानभूमीत माणूस हा आनंदाने जात नाही, कारण माणसावरील अंतिम संस्कारासाठी जड अंतकरणाने व पावलावे तो तिकडे जात असतो, त्याठिकाणी जाणाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर मोठे दु:ख असते़ त्यामुळे स्मशानात लग्न ही कल्पनाच मनाला रुचत नाही मात्र हे बार्शीत आज प्रत्यक्षात घडले आहे़ स्मशानभूमीमध्ये उभारलेल्या या सुविधांची निगा राखण्यासाठी बार्शी व परिसरातील कोण रहाण्यास तयार नव्हते त्यामुळे प्रसन्नदाता ट्रस्टने नांदेड येथून स्मशान जोगी कुटुंबाला बार्शीत आणले़ मागील कांही वर्षापासून लक्ष्मण धनसरवाडकर हे कुटुंब लहान मुला-बाळांसह याठिकाणी रहात आहे़ लक्ष्मण यांचे बंधू अंकुश घनसरवाडकर रा़ हदगाव जि़ नांदेड यांचा शुभविवाह छाया गंगाधर गंधेवाड रा़ हदगाव जि़ नांदेड यांच्याबरोबर ठरला व त्या कुटुंबाच्या आग्रहाखातर हा सोहळा आज दुपारी मोक्षधाममधील मुक्तेश्वर मुर्तीसमोर टाकलेल्या मांडवात मंगलअष्टकांसह संपन्न झाला़या अनोख्या विवाह सोहळ्यांची बार्शी व परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे़ यावेळी वधुवरांना शुभार्शिवाद देण्यासाठी आ़ दिलीप सोपल, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील,डॉ़ संजय अंधारे , प्रा़डॉ़ भारती रेवडकर,पो़नि़ गजेंद्र मनसावाले, मल्लीनाथ गाढवे, भगवंत देवस्थानचे दादा बुडुख, मातृभूमीचे सचिव प्रतापराव जगदाळे, मंडळाचे अध्यक्ष कमलेश मेहता,बंडू माने, बसवराज गाडवे, पाणीपुरवठा सभापती काकासाहेब फुरडे-पाटील, नगरसेवक नागेश अक्कलकोटे, विजय चव्हाण, पाचू उघडे, प्रशांत कथले, पृथ्वीराज रजपूत, भैय्या बारंगुळे, बापू जाधव, शिवशक्ती बँकेचे संचालक मुरलीधर चव्हाण, प्रदीप बागमार,विक्रांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ प्रास्ताविक राजाभाऊ काकडे यांनी केले़ यावेळी कमलेश मेहता यांनीही विचार व्यक्त केले़ विवाह सोहळ्यासाठी प्रसन्नदाता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले़