शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

सोलापुरात मराठा समाजाचा चक्का जाम

By admin | Updated: January 31, 2017 14:43 IST

मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसहीत विविध मागण्यांसाठी 7 ठिकाणी तर जिल्ह्यातील तालुक्याच्या मुख्य ठिकाणांवर शांतताप्रिय मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आला.

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 31 - मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसहीत विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत शहरात 7 ठिकाणी तर जिल्ह्यातील तालुक्याच्या मुख्य ठिकाणांवर शांतताप्रिय मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आला.
 
यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पुन्हा पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. जिल्ह्यातील काही ठिकाणी गावपातळीवरही आंदोलन करण्यात आले. शांतता मार्गाने आंदोलन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 
 
सोलापूर शहरात भैय्या चौक, सोलापूर-पुणे महामार्गावर नागोबा मंदिराजवळ, जुना तुळजापूर नाका येथील पुलाजवळ, हैदराबाद रोड येथील मार्केट यार्डजवळ, आसरा चौक, विजापूर रोडवर आयटीआयजवळ तसेच अक्कलकोट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ  अशा सात ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
 
या आहेत मराठा समाजाच्या मागण्या 
कोपर्डी प्रकरणातील आरोपीविरुद्ध तत्काळ भक्कम दोषारोपपत्र दाखल करून तो खटला द्रुतगती-जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी यासाठी शासनाने योग्य ते प्रयत्न करावेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील जाचक तरतुदी रद्द करून त्यामध्ये सुधारणा कराव्यात, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमधील कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी जरुर त्या उपाययोजना कराव्यात, सकल मराठा समाजाला प्रथम टप्प्यात शैक्षणिक व नोकरीत पूर्णपणे ओबीसी दर्जाचे आरक्षण मिळावे, महाराष्ट्रातील मराठा समाजाला इतर मागास वर्गात ओबीसीमध्ये समाविष्ट करुन घेऊन सरसकट मराठा समाजाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, इऱ्बी़सी़ सवलतीची मर्यादा रुपये सहा लाखांपर्यंत मिळावी, शेतक-यांच्या मुलांना उच्च शिक्षण मोफत मिळावे, राज्यातील आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ करिता भरीव निधीची  तरतूद करावी, मराठा आरक्षणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात भक्कम मांडण्याकरिता जरुर ती उपाययोजना प्रशासकीय पातळीवरुन करण्यात यावी, राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतक-यांच्या शेतीमालाला व कृषीपूरक उत्पादनाला हमीभाव मिळावा, शेतक-यांना पेन्शन योजना लागू करावी, आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसाला १० लाख रुपयांची तातडीची मदत करावी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय मराठा वसतिगृह सुरू करावे, मुंबई येथे अरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक तत्काळ पूर्ण करावे, महिला सुरक्षिततेसाठी कठोर कायदे करावेत आदी विविध मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 
 
जिल्ह्यात असा होता पोलीस बंदोबस्त
पोलीस बंदोबस्तात ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ पोलीस निरीक्षक, ७२ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १०७९ पोलीस कर्मचारी, ५ दंगा नियंत्रण पथक (एका पथकामध्ये १५ पोलीस), १६ स्ट्रायकिंग फोर्स (एका पथकात १० पोलीस), शीघ्र कृतीदल, ४०० होमगार्ड पुरुष, १०० होमगार्ड महिला असा एकूण १ हजार ७०८ जणांचा समावेश होता. 
 
शहरात होता तगडा बंदोबस्त तैनात
पोलीस आयुक्तांनी शहरातील सात ठिकाणी झालेल्या आंदोलनासाठी प्रत्येक ठिकाणी अ‍ॅब्युलन्स, क्रेन, डीपरसह प्रत्येकी ठिकाणी ३० असा २१०० पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. यावर नियंत्रणासाठी स्वत: पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, सहा. पोलीस आयुक्त अशी यंत्रणा कार्यरत होते. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.