शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

आंबा महोत्सवाचे उदघाटन, राज्यातील आंबा उत्पादक सोलापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:45 AM

मंद्रुप येथे निर्यात सुविधा केंद्राचा प्रस्ताव सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

ठळक मुद्देदेशात अडीच लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादनमध्यप्रदेशातील भोपाळ व इंदूरमध्येही आंबा महोत्सवाचे आयोजन

सोलापूर: दर्जेदार आंबा खायला मिळावा या संकल्पनेतून आंबा महोत्सवाची कल्पना पुढे आली असून, सोलापुरात डाळिंब निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी मंद्रुप येथील जागेचा प्रस्ताव असल्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ व सोलापूर बाजार समितीच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सोलापूरला नावारुपाला आणायचे आहे, सोलापूरकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले. शेतकºयांच्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यात १३५ आठवडा बाजार केंद्रे सुरू करण्यात आली असून, हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

मार्च २०१८ पर्यंत मागणी असलेल्या सर्व शेतकºयांना वीज कनेक्शन देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले. उसाचे क्षेत्र वाढल्याने पुढील वर्षी आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा तसेच कच्ची साखर व थेट इथेनॉल तयार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. मंद्रुप येथे निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पाटबंधारे खात्याच्या साडेतीन एकर जमिनीचा प्रस्ताव असून, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी ती जागा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे सहकार मंत्री देशमुख यांनी आवाहन केले.

शेतकºयांचे उत्पादन वाढण्यासाठी जलयुक्त शिवार योजना प्रभावी ठरली असून, जलयुक्त कामांमुळे जिल्ह्यात पाण्याचा साठा वाढल्याने उजनी धरणाचे पाणी शिल्लक असल्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले. स्थानिकांच्याही आंब्याला स्थान देण्यात यावे, असे सांगत निर्यात केंद्रासाठी मंद्रुपच्या जागेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हाधिकाºयांना केली. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बाजारात अपेक्षेप्रमाणे गुणवत्तेचा आंबा मिळण्याची खात्री नसल्याने आंबा महोत्सवाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर, पणनचे दिलीप नाईक, अशोक गार्डी, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे, सचिव मोहन निंबाळकर, मनपा महिला व बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, काशिनाथ कदम, गणेश चिवटे, श्रीकांत देशमुख, पं.स. सदस्य हरिदास शिंदे, संभाजी भडकुंबे, वैजिनाथ साबळे, श्रीमंत बंडगर, केदार उंबरजे, प्रभुराज विभुते आदी उपस्थित होते.

 मध्यप्रदेशातही आंबा महोत्सव- देशात अडीच लाख मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन होते, नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा खायला मिळावा यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जात असून, थेट आंब्याच्या विक्रीतून शेतकºयांना निर्यातीएवढेच पैसे मिळतात, मध्यप्रदेशातील भोपाळ व इंदूरमध्येही आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारMangoआंबा