शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाविकास आघाडीची प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक समिती स्थापन करणार, संजय राउत यांची माहिती

By राकेश कदम | Updated: December 10, 2023 18:47 IST

साेलापुरातील बैठकीनंतर हा याेग जुळून आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी सांगितले.

साेलापूर : महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅग्रेस या तीन पक्षांची जिल्हास्तरावर एक समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती लाेकसभा निवडणुकीसाठी काम करेल. साेलापुरातील बैठकीनंतर हा याेग जुळून आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी सांगितले.

खासदार संजय राउत रविवारी साेलापूरा दाैऱ्यावर आहेत. या दाैऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक घेतली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रवक्ते अशोक निंबर्गी, शिवसेनेचे पुरुषाेत्तम बरडे, अमर पाटील, राष्ट्रवादीचे महेश काेठे, यु.एन. बेरिया, मनाेहर सपाटे आदी उपस्थित हाेते.

राउत यांनी तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. साेलापूरचे लाेक लाेकसभा निवडणुकीत भावनिक हाेउन मतदान करतात. हे तुम्हाला बदलावे लागेल. साेलापूरचा विकास करायचा असेल तर चांगले लाेक निवडून दिले पाहिजेत. भाजप ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झाली आहे. हे केवळ इव्हेंट करतात. गुजरातच्या कंत्रादारांना कंत्राटे देतात. तुम्हाला लाेकशाही टिकविण्यासाठी काम करावे लागेल, असेही राउत यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण