शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

महात्मा गांधीजींचा अद्भुत प्रभाव ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:27 IST

माणूस जन्माला येतो आणि कालांतराने जगाचा निरोप घेतो. पण काही जण आपल्या जीवनात असे कार्य करतात की, आयुष्य संपल्यानंतरही ...

ठळक मुद्देभारतीय जन अमर रहे! गांधीजी अमर रहे!! भारत देश अमर रहे जय हिंद !!!जोपर्यंत भारताचं अस्तित्व आहे तोपर्यंत गांधी मरणार नाही, तो सदा पिढ्यान्पिढी जिवंत राहणार

माणूस जन्माला येतो आणि कालांतराने जगाचा निरोप घेतो. पण काही जण आपल्या जीवनात असे कार्य करतात की, आयुष्य संपल्यानंतरही त्यांचा प्रभाव त्या देशाच्या सर्वसामान्यांवर कायमचा कोरला जातो. त्यांचा प्रभाव कोठे आणि कोणत्या परिस्थितीत कसा जाणवेल ते कोणीही सांगू शकत नाही. असाच अनुभव मी प्रत्यक्ष माझ्या जीवनात अनुभवला असून, मी तो क्षण माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.

गोष्ट १९८८-८९ ची असेल. त्या काळी सोलापूर येथील कल्पना टॉकीजमध्ये सदर प्रसंग घडलेला होता. त्या काळात सदर ठिकाणी एकूण एक सरस इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होत होते आणि प्रेक्षकही भरपूर दाद द्यायचे. एकेदिवशी दुपारी साडेतीनच्या खेळाला मी सुद्धा चित्रपट पाहण्यासाठी गेलो. थिएटर भरलेले होते आणि चित्रपट सुरू होण्याअगोदर तेथे भारतीय समाचार चित्र चालू होते. त्यास लोक इंडियन न्यूज म्हणून संबोधायचे.

यावेळी गांधीजींची दांडी यात्रा यावर आधारित चित्रपट सुरू होता व तो दोन भागांचा असल्याने लोक कंटाळले होते. हळूहळू लोकांनी थिएटरमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि ते चालू चित्र समाचार बंद करून मूळ सिनेमा चालू करण्यासाठी गोंधळ घालू लागले. त्या समाचार चित्रातही एका सभेच्या ठिकाणी मंचावर गांधीजी बसलेले असताना लोक गोंधळ घालत असतानाचे चित्रण होते. गांधीजी त्या लोकांना हात उंचावून गप्प बसण्याची ताकीद देत होते. 

तो प्रसंग पाहून थिएटरमधील प्रेक्षक अजून गोंधळ करू लागले आणि इतक्यात कॅमेरा गांधीजींवर फोकस होऊन ते तोंडावर बोट ठेवून सर्वांना शांत बसण्याचे संकेत देताच थिएटरमधील प्रेक्षकांत प्रचंड हंशा पिकला. चित्रपटातील लोकही शांत झाले आणि थिएटरमधलेही लोक गप्प बसून सदर समाचार पत्र पाहू लागले. त्यानंतर मात्र कोणीही ब्र काढला नाही आणि पूर्ण चित्रपट संपल्यानंतर मुख्य चित्रपट सुरू झाला.

मी अवाक् झालो आणि विचार केला. गांधीजी निरोप घेऊन चाळीस वर्षे झाली असतील, पण आजही त्यांचा प्रभाव जनमानसावर कसा कायम आहे. तो प्रसंग त्यांचे महान होण्याचे एक छोेटेसे प्रमाण असून, आजही मी तो प्रसंग अनेकदा अनेकांना ऐकविला आहे. पण माझ्या मनातील चलबिचल, कालवाकालव तीस वर्षे झाली तरी ती गोष्ट, तो क्षण माझे मन विसरायला तयार नाही.कारण, गांधीजी हे आम्हा भारतीयांच्या मनात आणि रोमारोमात भिनलेले असून, त्यांच्या छबीच्या एका इशाºयाने आम्ही गप्प बसतो, यापेक्षा त्यांचे महात्म्य किती विशाल आणि भक्कम होते, हे नमूद करण्यासारखे आहे. 

असले क्रांती राजकारण, कटकारस्थान यामुळे त्यांना आयुष्यातून उठविण्यात आले. असे भ्याड कृत्य करणारे लोक हे  विसरतात की माणूस मरतो, विचार मरत नाहीत. जोपर्यंत भारताचं अस्तित्व आहे तोपर्यंत गांधी मरणार नाही, तो सदा पिढ्यान्पिढी जिवंत राहणार आहे. भारतीय जन अमर रहे! गांधीजी अमर रहे!! भारत देश अमर रहे जय हिंद !!!- वाय. एम. बेग (लेखक कामगार चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरMahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत