शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सोलापुरातील महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना; जाणून घ्या पहिल्या दिवसाअखेरचा संपूर्ण स्कोर कार्ड

By appasaheb.patil | Updated: February 2, 2024 18:17 IST

पहिल्या सत्रात सौराष्ट्र संघाची पडखळ सुरुवात झाली. सुरवातीच्या चौथ्या षटकातच हितेश वाळुंज याने सौराष्ट्र संघाला पहिला धक्का दिला. सं

सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेल्या रणजी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. पहिल्या डावात सौराष्ट्राचा संघ २०२ धावात गुंडाळला. दुपारनंतर महाराष्ट्र संघाने फलंदाजी सुरू केली मात्र महाराष्ट्राचा अर्धा संघ दिवसाअखेरपर्यंत तंबूत परतला. महाराष्ट्र संघाची धावसंख्या ६ बाद १०४ एवढ्या कायम राहिला. 

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता रणजी सामन्यास सुरूवात झाली. पहिल्या सत्रात सौराष्ट्र संघाची पडखळ सुरुवात झाली. सुरवातीच्या चौथ्या षटकातच हितेश वाळुंज याने सौराष्ट्र संघाला पहिला धक्का दिला. संघाची ११ अशी धावसंख्या असताना केविन जिवराजनी अवघ्या  (६) धावांवर पायचीत होऊन तंबूत परतला. त्यापाठोपाठ विश्र्वराज जडेजा याला सुद्या हितेश वाळुंज सहाव्या षटकात शून्य धावांवर परत पाठवले. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने सावध भूमिका घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु दहाव्या षटकात हितेश वाळुंज हा पुन्हा एकदा वरचढ ठरला. त्याने चेतश्वर पुजारा याला पायचीत केले. 

जेवणापूर्वी सौराष्ट्र संघाची धावसंख्या ३६ षटकात १०१ वर पाच बाद अशी झाली. जेवणानंतर दुसऱ्या सत्रात धमेंद्र जडेजा व पारेख मंकड यांनी डाव सावरला. दोघांमध्ये सहाव्या विकेट साठी ११८ धावांची शतकीय भागीदारी झाली. पारेख मंकड याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले परंतु त्याला फारकाळ विकेट वर थांबता आले नाही. ५६ धावांवर त्याला तरनजितसिंग डील्लन याने पायचीत केले.  धर्मेंद्र जडेजा एका बाजूने लढत असताना त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. 72 धावा केल्यानंतर त्याला हितेश वाळुंज याने कौशल तांबे द्वारे झेलबाद केले. त्यानंतर सौराष्ट्र संघाचा हितेश वाळुंज व तरणजित सिंघ डील्लन या दोघापुढे पूर्ण संघाने गुडघे टेकले. अवघा संघ चहापाण्यापर्यंत २०२ धावांवर गारद झाला. हितेश वाळुंज याने सहा बळी तर तरणजीत डील्लन याने चार बळी घेतले. 

दरम्यान, चहापानानंतर महाराष्ट्र संघ फलंदाजीसाठी आला असता सुरुवात निराशाजनक झाली. सहाव्या षटकात ओम भोसले अवघ्या ७ धावावर बाद झाला. त्यानंतर कौशल तांबे व अंकित बावणे यांनी डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. २० व्या षटकात अंकित बावणे वैयक्तीत ३४ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर कौशल तांबे सुद्धा लगेच माघारी परतल्याने महाराष्ट्र संघ एकापाठोपाठ एक गडी गमावत गेला. केदार जाधव (३) तर , सिद्धार्थ म्हात्रे (११) यांनी धावा केल्या . सौराष्ट्रकडून फिरकी गोलंदाज धर्मेंद्र जडेजा याने ४ बळी  आणि युवराज सिंग दोडिया यांनी २ बळी घेतले. दिवसाआखेर महाराष्ट्र संघ २९ षटकात ७  गडी बाद ११६ धावा करू शकला. सौराष्ट्र संघाची महाराष्ट्र संघावर आणखी ८६ धावांची आघाडी आहे. पंच म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच वीरेंद्र शर्मा (हिमाचल प्रदेश) तर रंजिव शर्मा (पंजाब) तर मॅच रेफ्री म्हणून बाळकृष्ण मिष्किन (गोवा) हे काम पाहत आहेत. 

सामना पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, व्हॉईस चेरमन श्रीकांत मोरे , अकलूज वरून अनिल जाधव, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त भोसले  इत्यादी मान्यवर महाराष्ट्र संघाला समर्थन देण्यासाठी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर