Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात होणार आहे. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये टीका सुरू आहेत. आज पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या निशाणा साधला. यावेळी त्यांनी गुवाहटीवरुन राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडतील, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.
यावेळी त्यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सध्या ठाकरे गट एकत्रीकरणाचा विषय पुढे येतोय. पण काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव साहेब यांच्या सोबत राज ठाकरे जर गेले, तर राज साहेबांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल.
बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
"मी पक्षात नाराज होते. पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत. मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेले नाही. असं काहीही झालेलं नाही. या सगळ्याला वेगळे वळण दिले जात आहे, असंही तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, 'माझ्या पुढच्या वाटचालीबाबत बोलायचे झाले तर मी पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात काम करत आहे. अभिषेक दोन टर्म इकडे संचालक होते. त्यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास खूप जास्त होता. मीदेखील चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. आता सहकार आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे ठेवून समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.