शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कमी पावसाचा फटका; आवक कमी झाल्याने सोलापुरातील पालेभाज्या महागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:28 IST

मेथीला ग्राहकांची पसंती : दर वाढल्यामुळे महिलांकडून सुरू आहे काटकसर

सोलापूर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण तरीही शहर व जिल्ह्यात पावसाने कमीच हजेरी लावली आहे. कमी पावसाचा फटका शेतीमालाला बसत आहे. यामुळे सोलापूर मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी पाच ते आठ रुपयांना मिळणारी मेथीची जुडी आता दहा ते पंधरा रुपयांना मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तेलाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चटका बसत आहे. परिणामी प्रत्येकजण आता काटकसर करत आहे. त्यात आता पालेभाज्यांचे दर वाढत असल्याने महिलांची काटकसर करताना ओढाताण होत आहे. पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाज्या या स्वस्त असल्यामुळे अनेक ग्राहक हे फळभाज्या घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. फळभाज्यांमध्ये कारली ४० रुपये, मिरची ५० रुपये, भेंडी ३० ते ४० रुपये, सिमला मिरची ३० ते ४० रुपये, कोबी २० रुपये किलो दराने मिळत आहे. तसेच बटाटे पंधरा ते वीस रुपयांना किलो मिळत आहेत.

 

पालेभाज्यांचे भाव...

  • मेथी १५
  • पालक १०
  • चुका ८
  • कोथिंबीर १५
  • पुदीना १०
  • शेपू १०

 

कर्नाटकातून येत आहेत पालेभाज्या

जिल्ह्यात पालेभाज्यांची आवक कमी होत असल्यामुळे अनेक भाजी विक्रेते हे कर्नाटकच्या सीमेवरील इंडी तालुक्यामधून पालेभाज्या आणून विकत आहेत. तेथून शेपू, पालक, मेथी आदी भाजीपाला येत आहे. तसेच पुणे येथूनही गाजर, काकडी आदी फळभाज्यांची आवक वाढत आहे. पालेभाज्यांची आवक कमी असल्यामुळे जेव्हा शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी येतो, तेव्हा व्यापाऱ्यांची खरेदीसाठी गर्दी झालेले चित्रही पाहायला मिळत आहे.

फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्या महाग मिळत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सर्व पालेभाज्या या पाच ते दहा रुपयांना जुडी मिळत होत्या. पण आता मेथी, शेपू पंधरा ते वीस रुपयांना मिळत असल्याने आम्ही फळभाज्या घेत आहोत.

- लता गायकवाड, ग्राहक

 

जेवणात पालेभाज्यांना खूप महत्त्व आहे. कारण पालेभाज्यांमुळे आरोग्य निरोगी राहते. पालेभाज्या जरी महाग झाल्या असल्या तरी, नाईलाजाने का होईना, आम्हाला खरेदी कराव्या लागतात.

- मंगल भोईटे, ग्राहक

 

सध्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यात पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. पण ग्राहक दर कमी करून मागत आहेत. यामुळे कधी कधी ग्राहकांना नाराज करू नये, यासाठी आणलेल्या दरात आम्हाला द्यावे लागते.

- अर्जुन हांडे, भाजी विक्रेता

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेतीRainपाऊस