शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

लोकमंगल, अदिनाथ, गोकुळ, जयहिंद, फॅबटेक साखर कारखाने यंदा राहणार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 15:29 IST

 एफआरपीची अडचण; सोलापूर जिल्ह्यातील ३८ पैकी ७ कारखान्यांनी मागितला नाही गाळप परवाना

ठळक मुद्देयंदाच्या गळीत हंगामासाठी गाळप परवाना मागणी करणाºया साखर कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील २७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ अशा ३८ कारखान्यांचा समावेश नितळी येथील जयलक्ष्मी या अवसायनात काढलेला करखानाही गाळप सुरू करण्याच्या तयारीत आहे

सोलापूर : यंदाच्या गळीत हंगामासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे आॅनलाईन अर्ज सादर केले आहेत; मात्र सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यांचे प्रस्ताव मुदतीत दिलेले नाहीत.

सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडे ३० सप्टेंबरअखेर यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास इच्छुक असलेल्या साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी विहित नमुन्यात आॅनलाईन अर्ज सादर करणे अपेक्षित होते , अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली.

ऊस उत्पादक शेतकºयांच्या ऊस बिलाची (एफआरपी) रक्कम काही कारखान्यांनी अद्यापपर्यंत अदा केली नाही तरीही त्यांना गाळप परवाना मागणीचा अर्ज करता येतो; मात्र कारखान्याने गतवर्षीच्या हंगामातील संपूर्ण देणी देऊन बेबाक दाखले   सादर केल्याशिवाय त्यांना परवाना मिळणार नाही. यातील काही कारखान्यांचा अपवाद वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपीची रक्कम जमा केली असली तरी परवाना मागणी न करण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे.

अर्ज न करणारे कारखाने

  • गोकुळ शुगर    :    धोत्री
  • लोकमंगल    :    भंडारकवठे
  • लोकमंगल    :      बीबीदारफळ
  • जयहिंद शुगर    :    आचेगाव
  • फॅबटेक    :    न्    नंदूर
  • आदिनाथ    :    करमाळा
  • मातोश्री लक्ष्मी शुगर    :    रुद्देवाडी

सोलापूर जिल्ह्यात २७ तर उस्मानाबादच्या ११ कारखान्यांचा समावेशयंदाच्या गळीत हंगामासाठी गाळप परवाना मागणी करणाºया साखर कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील २७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ अशा ३८ कारखान्यांचा समावेश आहे. नितळी येथील जयलक्ष्मी या अवसायनात काढलेला करखानाही गाळप सुरू करण्याच्या तयारीत आहे.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेती