शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

लॉकडाऊनचा वस्त्रोद्योगाला मोठा फटका; महिनाभरात दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 15:28 IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे वस्त्रोद्योगाला जवळपास दीडशे कोटींचा फटका बसला असून ३५ हजाराहून ...

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे वस्त्रोद्योगाला जवळपास दीडशे कोटींचा फटका बसला असून ३५ हजाराहून अधिक यंत्रमाग कामगाराची मजुरी थांबली आहे. याचा फटका यंत्रमाग उद्योजकांसोबत कामगारांनाही मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन लागू झाले. लॉकडाऊन करत असताना प्रतिबंधक उपाययोजनांची नियमावली लागू करून वस्त्रोद्योगाला परवानगी देण्यात आली. सोलापुरातील यंत्रमाग कारखान्यांमध्ये कामगारांसाठी राहण्यासाठी सोय नसल्याने त्यांना तिथे ठेवून कारखाने सुरू करणे शक्य नसल्याने जवळपास ९० टक्के कारखाने बंदच आहेत. सोलापुरात आठशे कारखानदार असून त्यांच्याकडे १४ हजार यंत्रमाग आहेत. या कारखान्यांमध्ये सुमारे ४० हजार कामगार काम करत आहेत. परंतु आता यातील केवळ दहा टक्केच कारखाने सुरू आहेत.

लॉकडाऊनमुळे कामगारांना येण्याजाण्यासाठी अडचण असल्याने कामगारांअभावी कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे दररोज पाच कोटी याप्रमाणे महिनाभरात दीडशे कोटींचा फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये कारखाने बंद ठेवावे लागल्याने झालेल्या नुकसानीतून कारखानदार अजूनही सावरलेले नसताना आता पुन्हा दुसऱ्या वर्षीही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कारखानदारांना आता आपला उद्योग बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी खंत कारखानदारातून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून यंत्रमाग कारखाने बंद असल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध कामगार संघटनांनी कामगारांना अनामत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सहायक कामगार आयुक्तांनी यात मध्यस्थी करून यंत्रमाग कारखानदारांशी चर्चा केली. त्यानंतर कामगारांना दोन हजार रुपये अनामत देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे. त्यामुळे या अनामत रकमेचा कारखानदारांवर सुमारे आठ कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगण्यात आले.

यंत्रमाग उद्योग कमालीचा अडचणीत

सोलापूर जिल्हा यंत्रमाग उद्योगधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी लोकमतला सांगितले, सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन झाल्याने यंत्रमाग उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये कामगारांना कारखान्यात ठेवून कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोलापुरातील यंत्रमाग कारखानदारांना कामगारांना कारखान्यात ठेवणे गैरसोयीचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे कामगारांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. कामगारांना ये-जा करण्यास परवानगी दिली तर कारखाने पूर्ववत सुरू राहतील.

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगcorona virusकोरोना वायरस बातम्या