शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकºयांच्या कर्जाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील विकास सोसायट्या बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:20 IST

सोलापूर मध्यवर्ती जिल्हा बँक, ७२ संस्थांचे प्रस्तावच नाहीत; निष्काळजीपणा भोवणार

ठळक मुद्देजुन्या मंजुरीप्रमाणे कर्ज वाटप सुरू नव्या कमाल मर्यादा मंजुरीनंतर त्याही शेतकºयांना कर्ज मिळेलजून अखेरपर्यंत मंजुरीचा विषय मार्गी लागेल

अरुण बारसकरसोलापूर: आगामी तीन वर्षांकरिता कर्ज वाटपाच्या कमाल मर्यादा मंजुरीसाठी अद्यापही ७२ विकास संस्थांचे प्रस्ताव आले नाहीत. दरम्यान, आलेल्या ११९० पैकी ८१ विकास संस्थांचे प्रस्ताव मंजूर झाले असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी दर तीन वर्षांनी कमाल मर्यादा मंजुरी घेतली जाते. ही मंजुरी त्या-त्या विकास संस्थांमार्फत प्रस्ताव तयार करुन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयाला सादर केली जाते.

डिसेंबर २०१७ पर्यंत हे प्रस्ताव येणे अपेक्षित होते; मात्र राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे काम असल्याने कमाल मर्यादा प्रस्तावाला काही महिने उशीर होईल असे सांगितले जाते होते; मात्र जून महिना उलटला तरी अद्यापही ७२ विकास सोसायट्यांचे प्रस्ताव जिल्हा बँकेला आले नाहीत. विकास सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या गावाच्या क्षेत्रात बागायती क्षेत्र वाढल्यास, द्राक्ष, ऊस, अन्य फळबागा किंवा पडीक क्षेत्र पिकाखाली आल्यास अशा क्षेत्राचा समावेश कर्ज वाटपात किंवा मंजुरी असलेल्या क्षेत्राची मर्यादा वाढविण्यास जिल्हा बँकेची मंजुरी घेतली जाते. तीन वर्षांतून एकदाच ही मंजुरी घेतली जाते.  जिल्ह्यातील १२६२ विकास संस्थांपैकी ११९० संस्थांचे प्रस्ताव जिल्हा बँकेकडे आले  असून ७२ संस्थांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत. तर आलेल्या प्रस्तावामधून ८१ संस्थांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.

करमाळा, माढा,मंगळवेढा 

  • च्प्रस्ताव सादर न करणाºया ७२ संस्थांमध्ये  करमाळ्याच्या सर्वाधिक संस्था आहेत. करमाळ्याच्या २८, माढ्याच्या ११, मंगळवेढ्याच्या १०, पंढरपूरच्या ९, दक्षिण सोलापूर व बार्शीच्या प्रत्येकी ५, सांगोल्याच्या दोन, उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यातील प्रत्येकी एक याप्रमाणे संस्थांचा समावेश आहे. अक्कलकोट व मोहोळ तालुक्यातील सर्वच संस्थांचे प्रस्ताव आले आहेत.

बार्शी, मोहोळ तालुक्याची आघाडी

  • कमाल मर्यादा मंजूर झालेल्या ८१ विकास संस्थांमध्ये बार्शी व मोहोळ तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यांचे प्रस्ताव लवकर आल्याने त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने मंजुरीही दिली आहे. बार्शीच्या १३५ पैकी २३, मोहोळच्या १२० पैकी १६, सांगोल्याच्या ८१ पैकी १५, माळशिरसच्या  १४३ पैकी १३, माढ्याच्या १७५ पैकी १०, उत्तर तालुक्यातील ६७ पैकी तीन तर करमाळ्याच्या ११३ पैकी एका संस्थेची कमाल मर्यादा मंजुरी झाली आहे.
  •  

कमाल मर्यादा नाही म्हणून कर्ज वाटप थांबणार नाही.  जुन्या मंजुरीप्रमाणे कर्ज वाटप सुरू आहे. नव्या कमाल मर्यादा मंजुरीनंतर त्याही शेतकºयांना कर्ज मिळेल. जून अखेरपर्यंत मंजुरीचा विषय मार्गी लागेल. - अविनाश देशमुख,प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी