शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जीवनात शिक्षणाबरोबर विद्या आणि कलागुणांचा समन्वय आवश्यक, अभिनेता अमेय वाघ याचे मत,  बीएमआयटीमध्ये अभिव्यक्त २०१८ चे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:23 IST

विद्या आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची आहे, मात्र चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्हींचा समन्वय आपण ठेवायला हवा, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केले.

ठळक मुद्देजीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि संघर्ष महत्त्वाचा - दिलीप माने विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची - अमेय वाघबीएमआयटी कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिव्यक्त २०१८’ या अभिनव कार्यक्रम

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ :  विद्या आणि कला या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाबरोबर कलाही महत्त्वाची आहे, मात्र चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्हींचा समन्वय आपण ठेवायला हवा, असे मत प्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ याने व्यक्त केले. बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील बीएमआयटी कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अभिव्यक्त २०१८’ या अभिनव कार्यक्रमाचे उद्घाटन अमेय वाघ याच्या हस्ते झाले. यावेळी तो बोलत होता. आयएमएसचे अमोल जोशी, संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने, उपाध्यक्ष पृथ्वीराज माने, संचालिका जयश्री माने, उद्योजक केतन शहा,बीएमआयटीचे प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, बीएमपीचे प्राचार्य डॉ. श्रीकांत जोशी, एसपीएमच्या प्राचार्य प्रा. रोहिणी चव्हाण, बीएमजेसीच्या प्राचार्या प्रा. प्रतिभा माने आदी मंचावर उपस्थित होते. अमेय म्हणाला, मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असल्याने वर्गाबाहेर जास्त असायचो. मी माझ्या कलागुणांना वाव दिला. यातून मी नाट्यकला आणि चित्रपट क्षेत्रात आलो. उद्या जाऊन आयटी क्षेत्रातील मुले ऐटीत जगतील. पण कॉलेज जीवनात इतर कलागुणही आपण जपायला हवेत. पुढे जाऊन चांगले आयुष्य जगण्यासाठी या दोन्ही गोष्टी आयुष्याचा बॅलन्स ठेवायला मदत करतील. पुढील काळात बीएमआयटीमध्ये एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरणही होईल, असा आशावादही त्याने व्यक्त केला. या उपक्रमासाठी बीएमआयटीचे संचालक प्रा. राहुल माने, प्रा. अश्विनकुमार भोपळे, प्रा. एम.सी. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. जतीन पाटील, प्रा. विशाल बगले, प्रा. अतुल कांबळे, प्रा. सुवर्णा भरगंडे, प्रा. स्वानंद नागणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सायली झालटे, सलोनी चवरे यांनी केले. ----------------------कष्ट आणि संघर्ष महत्त्वाचादिलीप माने म्हणाले, अमेयचे कष्ट आणि संघर्ष पाहून तो उद्याचा सुपरस्टार असेल याची खात्री आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि संघर्ष महत्त्वाचा आहे. बीएमआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुण विकासासाठी आणखी कार्यक्रम होतील, असे आश्वासन त्यांनी दिले. 

टॅग्स :Solapurसोलापूर