शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षीच्या निर्णयाची यंदाही अक्षता सोहळ्यासह सर्वच विधी वेळेत  !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:39 IST

राजशेखर हिरेहब्बू यांची माहिती; नंदीध्वज आडवे न करता भाविकांकडून पूजा स्वीकारण्याची परंपरा राखणार

ठळक मुद्देदुपारी दीडच्या आतच अक्षता सोहळा संपविण्याच्या ऐतिहासिक निर्णयसोलापूरकरांना ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे वेधयंदा नंदीध्वज मार्गावरच झळाळी नव्हे तर संपूर्ण शहर आणि परिसर यात्रेच्या निमित्ताने उजळून निघणार

सोलापूर : नंदीध्वज आडवे न करता भाविकांकडून पूजा स्वीकारायचे अन् अक्षता सोहळ्यासह सर्वच विधी वेळेत आटोपण्याच्या गेल्या वर्षी मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी घेतलेल्या निर्णयाची यंदाही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुपारी दीडच्या आतच अक्षता सोहळा संपविण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची प्रचिती यंदाही भाविकांना आल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राजशेखर हिरेहब्बू यांनी मंगळवारी दुपारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घरोघरी नंदीध्वज पूजन अन् नंदीध्वज सरावामुळे सोलापूरकरांना ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे वेध आतापासूनच लागले आहेत. 

२ डिसेंबर २०१८ रोजी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात बोलावण्यात आलेल्या बैठकीत अनेक धाडसी निर्णय घेताना राजशेखर हिरेहब्बू यांनी ‘लाखो भाविकांचा विचार करा. भावनेवर आवर घाला’ अशी विनंती करताना ‘मला समजावून घ्या’ अशी भावनिक साद घातली होती. त्यावेळी उपस्थित मानाच्या सातही नंदीध्वजांचे मानकरी, मास्तर, नंदीध्वजधाºयांसह भक्तगणांनी टाळ्याच्या गजरात त्यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले होते. राजशेखर हिरेहब्बू यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळेच गेल्या वर्षी अक्षता सोहळा अगदी वेळेत पार पडला होता. 

लख..लख यात्रा- प्रकाशमय यात्रा- २ डिसेंबर २०१८ रोजी हिरेहब्बू यांच्या वाड्यात झालेल्या बैठकीत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी भक्तगणांनी आपल्या घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन केले होते. ‘लोकमत’ने नंदीध्वज मार्गांवर झळाळी ही संकल्पना मांडली. ही संकल्पना वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले यांनी उचलली. त्यांच्या टीमने ही संकल्पना तडीस नेली अन् गेल्या वर्षी तमाम श्री सिद्धरामेश्वर भक्तांना ‘लख-लख यात्रा- प्रकाशमय यात्रा’ची प्रचिती आली. यंदा नंदीध्वज मार्गावरच झळाळी नव्हे तर संपूर्ण शहर आणि परिसर यात्रेच्या निमित्ताने उजळून निघणार आहे. यंदाची प्रकाशमय यात्रा यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजनच्या पाठीशी विविध जाती-धर्मातील सेवाभावी संघटनाही सरसावणार आहेत. 

मानकरी शिवानंद हिरेहब्बू यांच्या सल्ल्यानेच यात्रेतील प्रत्येक निर्णय अमलात आणले जायचे. त्यांचा शब्द म्हणजे इतर सदस्यांसाठी प्रमाण असायचा. गेल्या आॅगस्ट महिन्यात त्यांचे निधन झाले. गेल्या वर्षी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक निर्णयाची यंदाही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे.-राजशेखर हिरेहब्बू, यात्रेतील प्रमुख मानकरी. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्राSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका