शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जीवनगौरव पुरस्कारासाठी सोलापुरात आलेल्या राजा ढालेंची भेट ठरली शेवटची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:24 IST

चळवळ पोरखी झाली; शहर-जिल्ह्यात वाहण्यात आली श्रद्धांजली; चळवळींच्या आठवणीला उजाळा

ठळक मुद्देदलित पँथरच्या स्थापनेनंतर राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पट्टीचे दोन लेखक अन् साहित्यिकांचं नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आलं. १५ आॅगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख प्रसिद्ध झालाविचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाºया तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले

संताजी शिंदे 

सोलापूर : दलितांचा मुक्तीलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको... आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला साºया देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. अशी भूमिका मांडून २९ मे १९७२ रोजी स्थापन केलेल्या दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांची एप्रिल २०१८ मधील सोलापूरची भेट शेवटची ठरली. सम्यक विचार मंचच्या वतीने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 

दलित पँथरच्या स्थापनेनंतर राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पट्टीचे दोन लेखक अन् साहित्यिकांचं नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आलं. १५ आॅगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येने तरुणांनी पँथरमध्ये प्रवेश केला. प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होतं. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाºया तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले.

आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापुरात राजा ढाले हे नेहमी येत होते. १९७४ साली सुभाष चौकात दलित पँथरच्या प्रचारासाठी मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य हे होते. यावेळी वक्ते म्हणून राजा ढाले व अरुण कांबळे हे उपस्थित होते. सुभाष चौकातील सभा चांगलीच गाजली होती.  सम्यक विचार मंचच्या वतीने एप्रिल २0१८ मध्ये आयोजित केलेल्या मिलिंद व्याख्यानमालेत त्यांनी ‘फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ: बहुजनांची पे्रेरणा’ या विषयावर व्याख्यान दिले होते. सत्ताधाºयांना राज्यघटना राबवायची नाही, विषमतावादी व्यवस्था आणायची आहे. असे जर झाले तर येणाºया काळात देशात ज्वालामुखी निर्माण होईल आणि त्याला कोणी रोखू शकणार नाही, असे परखड मत राजा ढाले यांनी व्यक्त केले होते. आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यासक असलेल्या राजा ढाले यांची सोलापूर भेट ही शेवटची ठरली. 

देशात अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, तेव्हा महाराष्ट्रात राजा ढाले, ज.वी. पवार, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली दलित पँथरची स्थापना झाली. राजा ढाले यांचा सोलापूरशी चांगला ऋणानुबंध होता. त्यांच्या जाण्याने धगधगत्या आंबेडकरी चळवळीतील नेता हरपला आहे. - राजाभाऊ सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, महाराष्ट्र राज्य. 

दलित पँथरच्या नेतृत्वासह एक थोर विचारवंत, वस्तुनिष्ठ लेखक, परखड आंबेडकरवाद मांडणारा बुद्धिवंत, कुशल संघटक, फरडा वक्ता आज आम्हाला सोडून गेला. दलित पँथरचे वैचारिक आक्रमक नेतृत्व आम्हाला सोडून गेल्याने आंबेडकरी चळवळ पोरखी झाली आहे. - राजाभाऊ इंगळेप्रदेश उपाध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी

पँथरमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही पक्षाचा शिक्का मारून घेतला नाही. राजा ढाले नावाची आंबेडकरी चळवळ त्यांनी उभी केली. वैचारिक बैठक असलेले राजा ढाले हे शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीशी निष्ठेने राहिले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - सुभानजी बनसोडेमाजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते

टॅग्स :Solapurसोलापूर