शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १६ महामार्गांचे भूसंपादन, इतर कामांसाठी येणार १६ हजार कोटींचा निधी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:33 IST

आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

ठळक मुद्देसिध्देश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने केली यात्रा असल्याने भाविक आणि माणसांना प्राधान्य देऊन शहराला पाणी सोडावे, असे आदेश जलसंपदा विभागाला दिले : जिल्हाधिकारीएसीमध्ये बसून काम करण्याऐवजी लोकांमध्ये जा, माहिती घ्या आणि काम करा : जिल्हाधिकारी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १०  : आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सुरुवातीला शालेय जीवनापासून पशुवैद्यकीय पदवीपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले की, पदवी घेतल्यानंतर काही दिवस मार्केटिंगचे काम केले. माझे नेहमी सांगणे असते की, माणसाने आयुष्यात सेल्समन म्हणून काम करायला हवे. मग आपण किती  पाण्यात आहोत हे समजते. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात काही दिवस पशुवैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन उपजिल्हाधिकारी झालो आणि रत्नागिरी येथे रुजू झालो. प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून काही दिवस उल्हासनगर येथेही काम केले. १९९५ ची निवडणूक, २००९ ची माढा लोकसभा निवडणूक आदींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.  मला २५ ते २६ वरिष्ठ अधिकाºयांसोबत सेकंड इन कमांड म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यातून खूप शिकायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रमोद बोडके यांनी केले.-----------------------------सामाजिक आणि संवेदनशील पैलूंचाही उलगडावार्तालापात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या कार्यशैलीचा आणि संवेदनशील पैैलूंचाही उलगडा झाला. जव्हार येथे प्रातांधिकारी म्हणून काम करतानाचा किस्सा सांगताना डॉ. भोसले म्हणाले की, जव्हार येथील आदिवासी भागातील अनेक लोक जमिनीच्या वादासंदर्भातील सुनावणीला येत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे एके दिवशी एसटी चालक आणि कंडक्टर यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर रात्री मुक्कामाला जाणाºया बस चालकांकडे नोटिसा देऊन त्या पोहोच होतील, अशी व्यवस्था केली. शेवटी लोकांमध्ये मिसळून काम केल्याशिवाय कामे पूर्ण होणार नाहीत. जलसंपदा विभागाने माणसांना प्राधान्य द्यावेसिध्देश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. मात्र जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडू अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी म्हणाले की, यात्रा असल्याने भाविक आणि माणसांना प्राधान्य देऊन शहराला पाणी सोडावे, असे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. थकीत पाणीपट्टीसंदर्भात बैठक घेऊ, असे त्यांना सांगितले आहे. सिध्देश्वर यात्रेतील रस्त्याचा विषय हा धगधगता नाही. तो माझ्यासाठी आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. ----------------------------जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे सल्ले- आम्ही प्रशासनातील लोक हे जनरल फिजिशियनसारखे आहोत. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असलेली औषधे, आयुधे कोणती आहेत ही माहिती हवी. ही आयुधे वापरून लोकांची कामे करायला हवीत. - एसीमध्ये बसून काम करण्याऐवजी लोकांमध्ये जा, माहिती घ्या आणि काम करा. च्अपमान लक्षात ठेवावा, त्यातून शिकावे पण अपमान करणाºयाला लक्षात ठेवू नये.- मुंबई उपनगरात काम करताना ४० हजार अतिक्रमणे काढली, परंतु एकदाही वाद झाला नाही. बुल्डोझर घेऊन फिरण्यापेक्षा कायदेशीर मार्गांचा पुरेपूर वापर केला तर प्रश्न मार्गी लागू शकतो हे मी दाखवून दिले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय