शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

जिल्ह्यातील सहाशे गुऱ्हाळघरांना कुलपे

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

शेतकऱ्याला गूळ उत्पादनातून प्रतिटन ८०० ते १००० रुपयांचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र

प्रकाश पाटील - कोपार्डे --अवकाळी पाऊस, गुळाला मिळणारा दर, गुऱ्हाळासाठी द्यावा लागणारा खर्च व ऊस उत्पादनाचा खर्च यांचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्याला गूळ उत्पादनातून प्रतिटन ८०० ते १००० रुपयांचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मागली वर्षीपेक्षा या हंगामात आजअखेर अडीच लाख गूळ रव्यांची ८३० किलोप्रमाणे एक रवा कमी आवक झाली आहे. यावर्षी गुळाचा हंगाम आॅक्टोबरपासून सुरू झाला आहे. शुभारंभाचा सौदा साधारण ५५५५ ते ६६६६ असा माफक काढल्यानंतर गुळाच्या दराला ग्रहण लागले असून उत्पादन खर्च काय, पण एक क्विंटल गूळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या उसाचे साखर कारखाने देत असलेल्या दराचा विचार केल्यास ८०० ते १००० रुपये तोटाच सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. यातून गूळ उत्पादक असोसिएशनने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हमीभावासाठी जिल्ह्यातील गुऱ्हाळ बंद आंदोलन १७ ते २२ डिसेंबरअखेर केल्याने एक किलो गुळाची आवकही बाजार समितीत झाली नाही. यानंतर गुळाच्या दरात थोडीशी वाढ झाली असून गुळाला मिळणारा २६०० ते २७०० दर आज ३०५० ते ३००० प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.मात्र, या दरम्यान गुऱ्हाळघर मालकांनी गुऱ्हाळे बंद ठेवल्याने गावी गेलेले मजूर परत आणण्यास मोठी कसरत करावी लागत आहे, तर साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना एफआरपी २४०० ते २६०० प्रतिटन मिळत असल्याने गूळ उत्पादनांकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील ६०० गुऱ्हाळघरांना कुलपे लागली आहेत.बाजार समितीत दैनंदिन गूळ रव्यांची (३० किलोप्रमाणे) आवकही १५ ते १६ हजारांवर आली असून आजअखेर ७ लाख ४१ हजार १०६ गूळ रव्यांची आवक झाली आहे. मागीलवर्षी हीच आवक ९ लाख ८९ हजार ६७० होती. मागील वर्षीपेक्षा तब्बल अडीच लाख गूळ रव्यांची आवक कमी झाली आहे. यावरून गूळ उत्पादनाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले असून जर अशीच गुळाच्या दराबाबत अनास्था राहिल्यास जगप्रसिद्ध कोल्हापुरी गूळ उत्पादन ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया गुऱ्हाळघर मालक व गूळ उत्पादकांकडून व्यक्त होत आहेत.शासनाने कोल्हापूरचा गूळ उद्योग वाचवायचा असेल तर प्रथम गुळाला हमीभाव द्यावा. गुळाचे दर पडल्यास शासनाने गूळ खरेदी व्यवस्था करावी. त्याचबरोबर अडतचे शेतकऱ्यांच्या गळ्यातील घोंगडे कायमचे काढून शासनाने गूळ उत्पादकांना मदत करावी. - शिवाजी पाटील, अध्यक्ष, गूळ उत्पादक असोसिएशन कोल्हापूर जिल्हा.गुळाचे दर पडल्याने हा व्यवसाय व शेतकरी अडचणीत आले आहेत. दर पडल्याने हे कृत्रिम संकट गूळ उत्पादकांवर आले आहे. शासनाने लक्ष घातल्यासच गूळ उत्पादन टिकणार आहे.- शिवाजी तोडकर, गुऱ्हाळघर मालक, गूळ उत्पादक, वाकरेपणन संचालक सुभाष माने यांनी अडत खरेदीदारांकडून वसूल करण्याच्या निर्णयावर शासनाने व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडत स्थगिती दिली आहे. सध्या गुळाला जरी ३१०० रुपये दर मिळत असला तरी १ रु. ३० पैसे शेकडा अडत जात असल्याने ३००० रुपयेच शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत. कोल्हापुरी गूळ वाचविण्यासाठी कोल्हापूरचेच सहकारमंत्री असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी अडतचा पणन संचालकांचा निर्णय कायम ठेवून दिलासा द्यावा, अशा प्रतिक्रिया गूळ उत्पादकांकडून व्यक्त होत आहेत.गूळ उत्पादनापेक्षा कारखाना बराएक क्विंटल गूळ उत्पादनासाठी एक ते दीड टन ऊस गाळप करावा लागतो. गुळाला सध्या ३१०० रुपये क्विंटल दर आहे. त्यात आणखी प्रक्रिया खर्च किमान एक हजार येतो.एक टन उसाला साखर कारखाने देत असलेला २५०० रुपये प्रतिक्विंटल दर आणि यात गूळ प्रक्रिया एक हजार दर असा एकूण ३५०० रुपये एक क्विंटल गुळासाठी खर्च जातो आणि मिळतात क्विंटलला ३१०० रुपये म्हणजे पुन्हा ४०० रुपये तोटाच. त्यापेक्षा साखर कारखानेच बरे, असा मतप्रवाह ऊस उत्पादकांत निर्माण झाला असून यावर्षी साखर कारखान्यांना गुळाचे दर पडल्याने गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी जादा ऊस उपलब्ध होणार आहे.